दोन महामार्गांना जोडणारा रस्ता ठरणार सोयीचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 12:11 IST2020-02-13T12:11:19+5:302020-02-13T12:11:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विसरवाडी-सेंधवा महामार्गाचा दुसऱ्या टप्प्याचा मार्ग मोकळा झाला नसला तरी वळण रस्त्याच्या मार्ग मात्र मोकळा ...

दोन महामार्गांना जोडणारा रस्ता ठरणार सोयीचा
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : विसरवाडी-सेंधवा महामार्गाचा दुसऱ्या टप्प्याचा मार्ग मोकळा झाला नसला तरी वळण रस्त्याच्या मार्ग मात्र मोकळा झाला आहे. समशेरपूर ते थेट करणखेडा हा साधारणत: ३५ किलोमिटरचा मार्ग दहा मिटर रुंदीकरण करून केला जात आहे. विशेष म्हणजे महाराष्टÑ-गुजरात राज्याच्या हद्दीलगत असलेला हा रस्ता विसरवाडी-सेंधवा व शेवाळी-नेत्रंग महामार्गाला नंदुरबार बायपास म्हणून उपलब्ध होणार आहे. या रस्त्याच्या कामाला वेग देण्यात आला आहे.
नंदुरबार शहरातून दोन महामार्ग आणि एक राज्यमार्ग जाणार आहे. यामुळे शहरातील वाहतुकीचा ताण वाढणार आहे. दोन महामार्गाअंतर्गत नंदुरबार बाहेरून वळण रस्ता करावा अशी मागणी जोर धरू लागली परंतु नवीन जमीन अधीग्रहण करणे आणि ती पुर्ण प्रक्रिया राबविणे, त्यासाठी निधी उपलब्ध करून घेणे या बाबी अडचणीच्या होत्या. त्यामुळे रिंगरोडचा प्रस्ताव बारगळला होता. आता अॅन्युटी योजनेअंतर्गत ३५ किलोमिटरचा रस्त्याचे रुंदीकरण केले जात आहे.
समशेरपूर ते करणखेडा
अॅन्युटी योजनेअंतर्गत होणाºया रस्त्याच्या कामात समशेरपूर ते करणखेडा हा रस्ता तयार केला जात आहे. पूर्वी हा रस्ता होता, परंतु तो जिल्हा मार्ग म्हणून ओळखला जात होता. परंतु दोन राज्यांच्या सिमेवरून जाणारा आणि दोन राष्टÑीय महामार्गांना जोडणारा रस्ता म्हणून त्याकडे पाहिले जात असल्यामुळे त्याचे रुंदीकरण करण्यात येत आहे. आता हा रस्ता थेट दहा मिटरचा होणार आहे. विसरवाडी-सेंधवा महामार्गापासून निधून सुजालपूर, शिंदे, खोडसगाव, आडछी, गुजरभवाली, जांभोली आणि करणखेड्याला हा रस्ता पुन्हा विसरवाडी-सेंधवा महामार्गाला मिळणार आहे.
या दरम्यान हा रस्ता शेवाळी-नेत्रंग महामार्ग ओलांडून देखील जाणार आहे. त्यामुळे अंकलेश्वर-बºहाणपूर महामार्गाकडून येणारी वाहने थेट नंदुरबारला न येता करणखेडामार्गे नवापूरकडे किंवा साक्रीकडे जाऊ शकतील. शिवाय जाणारी वाहने देखील तशीच जाणार आहेत. यामुळे नंदुरबारातील सध्या असलेल्या वळण रस्त्यावरील वाहतुकीचा ताण बºयाच प्रमाणात कमी होणार आहे.
३५ किलोमिटरचा रस्ता
सुजालपूरपासून ते करणखेडापर्यंतचा हा रस्ता ३४.८५ किलोमिटरचा आहे. दहा मिटर रुंदीचा हा रस्ता असून ठिकठिकाणी फरशीपूल आणि छोटेपूलही तयार केले जात आहेत. संपुर्ण रस्ता हा गुजरात व महाराष्टÑ सिमेलगतच्या गावांमधून जात आहे. त्यामुळे त्याचा दर्जाही चांगला ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ६० टक्के निधी हा राज्य शासन थेट देणार आहे तर ४० टक्के निधी हा दहा वर्षात टप्प्याटप्प्याने ठेकेदाराला दिला जाणार आहे. नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत हा रस्ता तयार केला जात आहे. ज्या गावातून हा रस्ता जाईल त्या गाव हद्दीत दोन्ही बाजुला गटार व त्यावर स्लॅब टाकण्याची जबाबदारी संबधीत ठेकेदाराची राहणार आहे.
या रस्त्यामुळे या भागातील दळणळवण सोपे होऊन या गावांचा विकासाला देखील मदत मिळणार आहे. त्यामुळे या रस्त्यााचे काम लवकर आणि दर्जेदार होण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत.
अशाच प्रकारचा वळण रस्ता किंवा दहा मिटर रुंदीचा रस्ता हा शेवाळी-नेत्रंग महामार्गापासून निघून दुधाळे, भोणे, वावदमार्गे नंदुरबार-दोंडाईचा रस्त्याला जोडल्यास मोठी सोय होणार आहे. अर्थात शिरपूर, सोनगीर, दोंडाईचाकडून येणारी वाहतूक या मार्गाने वळून पुन्हा महामार्गाला जोडली जाणार आहे. परिणामी नंदुरबारात अशी वाहने येण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. हा रस्ता देखील जिल्हा मार्ग म्हणून सध्या अस्तित्वात आहेच.
वावदपासून पुढे उमर्दे व तेथून पातोंडाला हा रस्ता जोडल्यास पुन्हा महामार्गाला जोडला जाणार आहे. एमआयडीसीत येणारी व जाणारी वाहने या रस्त्याने परस्पर जावू शकतील. एमआयडीसीचा देखील विकास होण्यास त्यामुळे मदत होणार आहे. तसे झाल्यास नंदुरबारच्या बाहेरून पुर्ण रिंगरोड अस्तित्वात येऊ शकेल आणि त्यासाठी नवीन जागा अधिग्रहीत करण्याची देखील गरज राहणार नसल्याचे स्पष्ट आहे.