शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

ही तर गरिबाची थट्टा; आदिवासी मुलींना आजही मिळतो फक्त १ रुपया भत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 17:08 IST

आदिवासी भागात शाळेतील मुलींची पटसंख्या वाढविण्यासाठी सरकारने प्रोत्साहनपर भत्ता सुरू केला. पण..

नंदुरबार - आदिवासी क्षेत्रातील पहिली ते चौथीपर्यंत शिकणाऱ्या मुलींना केवळ एक रुपया भत्ता देण्यात येत आहे. आदिवासी भागात शाळेतील मुलींची पटसंख्या वाढविण्यासाठी सरकारने प्रोत्साहनपर भत्ता सुरू केला. त्यानुसार आदिवासी क्षेत्रातील दारिद्र रेषेखालील मुली आणि आदिवासी क्षेत्राबाहेरील अनुसूचित जाती, जमाती, भटक्या जमातीतील मुलींना हा भत्ता देण्यात येतो. मात्र, गेल्या 25 वर्षांपासून या सावित्रीच्या लेकींना दररोज केवळ 1 रुपया मिळत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. 

लोकप्रतिनिधी, प्रशासकीय सेवेतील अधिकारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वर्षानुवर्षे भरमसाट वाढ होते. मात्र, सावित्रीबाई फुलेंच्या नावाने सुरु केलेल्या या योजनेतील प्रोत्साहन भत्ता वाढविण्याचा साधा प्रयत्नही शासनाच्यावतीने करण्यात आला नाही. सन 1992 मध्ये तत्कालीन सरकारने प्रति विद्यार्थीनी 1 रुपये भत्ता सुरु केला होता. मात्र, महागाईने कळस गाठल्यानंतरही या मुलींना केवळ 1 रुपये भत्ता देण्यात येत आहे. या मिळणाऱ्या 1 रुपयांच्या भत्त्यातून साधी पेन किंवा पेन्सीलही विकत घेणे सध्याच्या काळात शक्य नाही. विशेष म्हणजे गतवर्षी या योजनेचे 25 वे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. तरिही, शासनाला या भत्त्यामध्ये वाढ करावी, असे वाटले नाही. दरम्यान, एकीकडे सरकार मुलींच्या शिक्षणासाठी जोमाने प्रयत्न करत आहे. त्याच्या जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. मात्र, या आदिवासी भागातील मुलींकडे, त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायला सरकारला अजिबात वेळ नाही.

टॅग्स :Schoolशाळाeducationशैक्षणिक