शहरं
Join us  
Trending Stories
1
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
2
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
3
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
4
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
5
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
6
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
7
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
8
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
9
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
10
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
11
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
12
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
13
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
14
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
15
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
16
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
17
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
18
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
19
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
20
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
Daily Top 2Weekly Top 5

अमृत आहार गैरप्रकार :सर्व संबधीत घटकांवर जबाबदारी निश्चित करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 12:23 IST

अमृत आहारमधील गैरप्रकार प्राथमिक स्तरावर महिला व बालविकास विभागानेही मान्य केल्यानेच आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशीचे आदेश दिले आहेत. ती चौकशी झालीच पाहिजे. -लतिका राजपूत

संडे स्पेशल मुलाखत

मनोज शेलारलोकमत न्यूज नेटवर्कलॅाकडाऊनमध्ये जनतेला गावोगावी रेशनचे मोफत धान्य पोहचू शकते तर अंगणवाडी सेविकांना अमृत आहारचा पुरवठा का होऊ शकत नाही. जिल्ह्यातील ठेकेदार तयार असतांना थेट पुण्याचा ठेकेदार नेमण्याची गरज काय? आहार पुरवठ्यात झालेल्या दिरंगाईची आणि गैरप्रकाराची निष्पक्षपातीपणे चौकशी करावी व कुणा एकावर नव्हे तर त्यातील संबधीत सर्व घटकांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी अशी आमची आजही मागणी कायम असल्याचे हा गैरप्रकार उघड करणारे व नर्मदा आंदोलनाच्या कार्यकर्त्या तसेच जिल्हा व राज्य गाभा समितीच्या अशासकीय सदस्या लतिका राजपूत यांनी ‘लोकमत’शी बोलतांना स्पष्ट केले. 

योजनेतील गैरप्रकार आपल्या कशा लक्षात आला?लॅाकडाऊनच्या काळात अर्थात एप्रिल व मे महिन्यात अमृत आहार मिळतो का? म्हणून सहज चौकशी केली, तर अनेक ठिकाणी तो उपलब्ध झाला नसल्याचे दिसून आले. २१ मे रोजी गाभा समितीच्या राज्य बैठकीत हा मुद्दा मांडला. तेथे वाटप सुरू असल्याचा दावा करण्यात आला. पुन्हा तपासणी केली परंतु तोच प्रकार दिसून आला. त्यानंतर जून महिन्यात ब्लाॉक लेव्हलचा बैठका झाल्या त्यावेळी वाटपाचे नियोजन सुरू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर माल कुठून येतो आहे विचारणा केली तर खालून वरपर्यंत सर्वांचे एकच उत्तर वरून येत आहे एवढेच होते. त्यानंतर खोलात जाऊन तपास केला असता पुणे येथील ठेकेदार असल्याचे स्पष्ट झाले आणि गौडबंगाल समोर आले. मिडियानेही यासंदर्भात वृत्त प्रकाशीत केले. २४५ अंगणवाडीव्यतिरिक्त इतर कुठल्याही अंगणवाडीत आहार पुरवठा झाला नव्हता हे सिद्ध झाले आहे. आता त्यातील गैरप्रकार बाहेर निघावे हीच आमची मागणी आहे. 

दोन्ही समितींकडून मवाळपणा का? जिल्हास्तरीय चौकशी समिती नेमली त्यात जिल्हा परिषदेचे अधिकारी नेमले गेले. जिल्हा परिषदेचा गैरप्रकार जिल्हा परिषदेचे अधिकार करणार तर तो चौकशी अहवाल कसा राहील हे स्पष्टच आहे आणि झालेही तसेच. नंतर नेमलेल्या समितीनेही दुर्गम भागातील अंगणवाडींमध्ये चौकशी न करता सपाटीवरील भागातील अंगणवाडीची चौकशी करून अहवाल सादर केला. आता राज्य स्तरावरूनच आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होणार असल्याने सर्व काही स्पष्ट होईल.पुढची भुमिका काय?या प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा संशय आहेच, परंतु दोन महिने आहार पोहचला नाही. लाभार्थी लाभापासून वंचीत राहिले. या सर्वांची आता निपक्षपातीपणे चौकशी होईल तोपर्यंत आम्ही याचा पाठपुरावा सुरूच ठेवणार आहोत.