शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
5
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
6
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
7
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
8
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
9
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
10
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
11
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
12
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
13
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
14
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
15
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
16
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
17
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
18
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
19
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
20
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब

अमृत आहार गैरप्रकार :सर्व संबधीत घटकांवर जबाबदारी निश्चित करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 12:23 IST

अमृत आहारमधील गैरप्रकार प्राथमिक स्तरावर महिला व बालविकास विभागानेही मान्य केल्यानेच आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशीचे आदेश दिले आहेत. ती चौकशी झालीच पाहिजे. -लतिका राजपूत

संडे स्पेशल मुलाखत

मनोज शेलारलोकमत न्यूज नेटवर्कलॅाकडाऊनमध्ये जनतेला गावोगावी रेशनचे मोफत धान्य पोहचू शकते तर अंगणवाडी सेविकांना अमृत आहारचा पुरवठा का होऊ शकत नाही. जिल्ह्यातील ठेकेदार तयार असतांना थेट पुण्याचा ठेकेदार नेमण्याची गरज काय? आहार पुरवठ्यात झालेल्या दिरंगाईची आणि गैरप्रकाराची निष्पक्षपातीपणे चौकशी करावी व कुणा एकावर नव्हे तर त्यातील संबधीत सर्व घटकांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी अशी आमची आजही मागणी कायम असल्याचे हा गैरप्रकार उघड करणारे व नर्मदा आंदोलनाच्या कार्यकर्त्या तसेच जिल्हा व राज्य गाभा समितीच्या अशासकीय सदस्या लतिका राजपूत यांनी ‘लोकमत’शी बोलतांना स्पष्ट केले. 

योजनेतील गैरप्रकार आपल्या कशा लक्षात आला?लॅाकडाऊनच्या काळात अर्थात एप्रिल व मे महिन्यात अमृत आहार मिळतो का? म्हणून सहज चौकशी केली, तर अनेक ठिकाणी तो उपलब्ध झाला नसल्याचे दिसून आले. २१ मे रोजी गाभा समितीच्या राज्य बैठकीत हा मुद्दा मांडला. तेथे वाटप सुरू असल्याचा दावा करण्यात आला. पुन्हा तपासणी केली परंतु तोच प्रकार दिसून आला. त्यानंतर जून महिन्यात ब्लाॉक लेव्हलचा बैठका झाल्या त्यावेळी वाटपाचे नियोजन सुरू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर माल कुठून येतो आहे विचारणा केली तर खालून वरपर्यंत सर्वांचे एकच उत्तर वरून येत आहे एवढेच होते. त्यानंतर खोलात जाऊन तपास केला असता पुणे येथील ठेकेदार असल्याचे स्पष्ट झाले आणि गौडबंगाल समोर आले. मिडियानेही यासंदर्भात वृत्त प्रकाशीत केले. २४५ अंगणवाडीव्यतिरिक्त इतर कुठल्याही अंगणवाडीत आहार पुरवठा झाला नव्हता हे सिद्ध झाले आहे. आता त्यातील गैरप्रकार बाहेर निघावे हीच आमची मागणी आहे. 

दोन्ही समितींकडून मवाळपणा का? जिल्हास्तरीय चौकशी समिती नेमली त्यात जिल्हा परिषदेचे अधिकारी नेमले गेले. जिल्हा परिषदेचा गैरप्रकार जिल्हा परिषदेचे अधिकार करणार तर तो चौकशी अहवाल कसा राहील हे स्पष्टच आहे आणि झालेही तसेच. नंतर नेमलेल्या समितीनेही दुर्गम भागातील अंगणवाडींमध्ये चौकशी न करता सपाटीवरील भागातील अंगणवाडीची चौकशी करून अहवाल सादर केला. आता राज्य स्तरावरूनच आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होणार असल्याने सर्व काही स्पष्ट होईल.पुढची भुमिका काय?या प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा संशय आहेच, परंतु दोन महिने आहार पोहचला नाही. लाभार्थी लाभापासून वंचीत राहिले. या सर्वांची आता निपक्षपातीपणे चौकशी होईल तोपर्यंत आम्ही याचा पाठपुरावा सुरूच ठेवणार आहोत.