शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

कृषी तंत्रज्ञान महोत्सवास प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 15:17 IST

कृषी विज्ञान केंद्र : शेतक:यांनी अवगत केली आधुनिक माहिती, कृषीतज्ज्ञांकडून मार्गदर्शन

नंदुरबार : डॉ.हेडगेवार सेवा समितीच्या नंदुरबार येथील कृषी विज्ञान केंद्रात सुरु झालेल्या 13 व्या कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी प्रदीप लाटे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी डॉ.हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष कृष्णदास पाटील होते. या वेळी कृषी विकास अधिकारी लाटे म्हणाले की, नंदुरबार येथील कृषी विज्ञान केंद्राने सुरु केलेली ‘कृषी तंत्रज्ञान महोत्सवाची’ संकल्पना आता संपूर्ण देशातील कृषी विज्ञान केंद्रांमध्ये राबवली जात आहे. ही अत्यंत अभिमानास्पद बाब असल्याचे ते म्हणाले. कृष्णदास पाटील यांनी जमिनीची उत्पादकता वाढविणे आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शेतक-यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन केले.आधुनिक डॉ.हेडगेवार सेवा समितीच्या नंदुरबार येथील तंत्रज्ञानाच्या प्रचार-प्रसारासाठी विविध पर्याय असून डॉ.हेडगेवार सेवा समितीच्या नंदुरबार येथील तंत्रज्ञान महोत्सवाची उपयुक्तता जास्त आहे. यात शेतकरी, युवक, शेतकरी महिला तसेच बचतगट या सर्व घटकांसाठी विविध प्रकारचे तंत्रज्ञान जवळून पाहण्याची संधी उपलब्ध होत असल्याचे कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख राजेंद्र दहातोंडे यांनी प्रास्ताविकात सांगितले. सध्याच्या काळात शेतीची कामे वेळेत पूर्ण करणे गरजेचे असल्याने शेतक:यांचा कल यांत्रिकीकरणाकडे वाढतो आहे. हे लक्षात घेवून नंदुरबार जिल्ह्यासाठी आवश्यक असलेल्या पीक अवशेषांच्या व्यवस्थापनासाठीच्या यंत्राची उपयुक्तता विषय विशेषज्ञ जयंत उत्तरवार यांनी मांडली. ट्रॅक्टरचलित यंत्रांचे उच्च दर्जाचे उत्पादन करणा:या शक्तीमान कंपनीचे उपव्यवस्थापक पराग बडगुजर यांनी कापसाच्या प:हाटीचे तुकडे करणारे कॉटन स्टॉक श्रेडर उसाच्या पाचटाचे तुकडे करून पसरविणारे यंत्र, रोटाव्हेटर आणि नांगर यांचे एकत्रितपणे कार्य करणारे पॉवरहॅरो, ट्रॅक्टरचलित फवारणीयंत्र, खड्डे खोदण्यासाठी उपयुक्त पोस्टहोल डिगर या यंत्राची तांत्रिक माहिती आणि वापरण्याची पद्धत याविषयी माहिती दिली. कंपनीचे विभागीय विपणन अधिकारी प्रशांत केवट यांनी यंत्रासाठी शासनाच्या योजनांविषयी शेतक-यांना माहिती दिली. जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी जमिनीतील सेंद्रीय पदार्थ, सेंद्रीयकर्ब यांचे महत्त्व कृषी विज्ञान केंद्राचे  विषय विशेषज्ञ आर.एम. पाटील यांनी विषद केले. सेंद्रीय कर्ब वाढविण्यासाठी पिकांच्या वाया जाणारे अवशेष पुन्हा जमिनीत टाकणे गरजेचे असल्याचे सांगून त्यासाठीच्या गांडूळखत, सेंद्रीयखत आदी पद्धतीची माहिती दिली.  सूत्रसंचालन जयंत उत्तरवार यांनी केले. कार्यक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्राचे आर.एम. पाटील, पी.सी. कुंदे, यु.डी. पाटील, डॉ.महेश गणापुरे, आर.आर. भावसार, व्ही.एस. बागल, गीता कदम, विजय बागल, राहुल नवले, रजेसिंग राजपूत, किरण मराठे, कल्याण पाटील, कैलास सोनवणे यांनी सहकार्य केले.