शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
4
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
5
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
6
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
7
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
8
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
9
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
10
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
11
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
12
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
13
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?
14
महापालिका डायरी: होर्डिंगसाठी बीएमसीची परवानगी तर घ्यावी लागेलच!
15
अन्वयार्थ: अभियांत्रिकीच्या प्रवेशाबाबत विद्यार्थी आणि पालकांचा संभ्रम
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

रेल्वे बोगदा : असून अडचण, नसून खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 11:59 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :नळवा रस्त्यावरील रेल्वे बोगद्याचे काम हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे पुर्ण करण्यात आले आहे. परंतु रेल्वेच्या परवाणगी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :नळवा रस्त्यावरील रेल्वे बोगद्याचे काम हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे पुर्ण करण्यात आले आहे. परंतु रेल्वेच्या परवाणगी अभावी ते धूळखात पडून आहेत. राजकीय श्रेयाचा वादात हे बोगदे अडकल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, शहरवासीयांच्या अडचणीचा विचार करून या कामाला प्राधान्य द्यावे अशी मागणी होत आहे. उड्डाणपुलावरील वाहतुकीची मर्यादा लक्षात घेता अनेक वाहनचालक नळवा रस्त्यावरील रेल्वे बोगद्याचा वापर करतात. परंतु या ठिकाणच्या अडचणींमुळे वाहनचालकांना मोठय़ा समस्येला सामोरे जावे लागते. शहरातून गेलेल्या रेल्वे मार्गामुळे शहराचे दोन भागात विभाजन झाले आहे. पूर्वी रेल्वे गेटमुळे वाहतुकीचा ताण होता. परंतु दहा वर्षापूर्वी उड्डाणपुल बांधण्यात आल्यानंतर थोडीफार समस्या सुटली आहे. उड्डाणपुलासह नळवा रस्त्यावर बोगद्याद्वारे देखील वाहतूक केली जाते. परंतु एकच बोगदा असल्यामुळे एकाचवेळी दोन वाहने जाऊ शकत नाहीत. शिवाय चारचाकी वाहनांना देखील मर्यादा असतात. त्यामुळे या रस्त्यावर दुसरा बोगदा असावा यासाठीची मागणी करण्यात येत होती. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आघाडी शासन काळात त्यासाठी निधी मंजुर करून घेतला होता. परंतु निधी मंजुर होताच निवडणुका लागल्या आणि भाजप सरकार सत्तेत आले. नंतर बोगदा कामाची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानंतर संबधीत ठेकेदाराने या बोगद्यांचे काम अत्याधुनिक पद्धतीने केले. काम पुर्ण होऊन वर्ष लोटले आहे. परंतु बोगदे त्यांच्या जागी अद्याप बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे  नसून अडचण व असून खोळंबा अशी म्हणण्याची वेळ शहरवासीयांवर आली आहे. यासंदर्भात गांभिर्याने घेवून दोन्ही बोगदे बसविण्यात येवून कार्यान्वीत करावे, अशी मागणी आहे.