पोषक वातावरणामुळे रब्बी पिके तरारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 12:26 IST2020-02-19T12:26:18+5:302020-02-19T12:26:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : खरीप हंगाम लवकर आटोपून रब्बीसाठी बहुतांश शेतकऱ्यांनी पिक पेरणी केली. त्यातील बहुतांश पिके परिपक्वतेच्या ...

Rabbi crops are fed by nutritious environment | पोषक वातावरणामुळे रब्बी पिके तरारली

पोषक वातावरणामुळे रब्बी पिके तरारली

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : खरीप हंगाम लवकर आटोपून रब्बीसाठी बहुतांश शेतकऱ्यांनी पिक पेरणी केली. त्यातील बहुतांश पिके परिपक्वतेच्या उंबरठ्यावर आले आहे. त्यात बाजरी, हरभरा यासह गहू पिकांचा समावेश आहे.
अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी खरीपातील कामे तातडीने आटोपून रब्बी हंगामाला सुरुवात केली. लवकर पेरणी झालेल्या पिकांना पाण्याच्या मुबलकतेमुळे अपेक्षेनुसार पाणी देता आले. या आधारे या पिकांची चांगली वाढ होऊ शकली, तर सद्यस्थितीत ही पिके परिपक्वदेखील झाली आहे. जिल्ह्यातील नोव्हेंबरनंतर अवकाळी पाऊस झाला नसल्याने ही पिके सुरक्षीत राहिली असल्याने ही पिके शेतकºयांना भरघोस उत्पन्नाची हमी देत आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. हे समाधान व्यक्त होत असतांनाच वातावरणाने अशीच साथ द्यावी, अशी अपेक्षा देखील व्यक्त केली जात आहे.

Web Title: Rabbi crops are fed by nutritious environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.