वीज बिलाच्या तक्रारींसाठी ग्राहकांच्या लागल्या रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 12:26 IST2020-06-26T12:26:21+5:302020-06-26T12:26:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वीज बील दुरूस्तीसाठी आणि तक्रारींसाठी वीज कंपनीच्या कार्यालयात नागरिकांच्या चकरा वाढल्या आहेत. गुरुवारी सकाळी ...

वीज बिलाच्या तक्रारींसाठी ग्राहकांच्या लागल्या रांगा
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : वीज बील दुरूस्तीसाठी आणि तक्रारींसाठी वीज कंपनीच्या कार्यालयात नागरिकांच्या चकरा वाढल्या आहेत. गुरुवारी सकाळी तर रांगा लागल्या होत्या. दरम्यान, संबधीत अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून वारंवार समजवून देखील ग्राहकांचे समाधान होत नसल्याचे चित्र आहे.
लॉकडाऊनच्या काळातील अडीच ते तीन महिन्यांचे एकत्रीत वीज बील ग्राहकांच्या हाती पडत आहे. वीज बिलातील रक्कम पाहून अनेक ग्राहकांना घाम फुटला आहे. ही बाब लक्षात घेता अनेकजण वीज कंपनीच्या कार्यालयात जाऊन वीज बिलाबाबत तक्रार करून आक्षेप घेत आहेत. संबधित अधिकारी व कर्मचारी त्यांचे समाधान करून देण्यासाठी प्रयत्न देखील करीत आहेत. परंतु ग्राहकांचे समाधान होत नसल्याचे चित्र आहे. बुधवारी तर तक्रारी करणाऱ्यांची रांगच लागली होती.
काही ग्राहकांनी मात्र आॅनलाईन लिंकवरील आपल्या बिलाची पडताळणी करून त्याची शहनिशा करून आॅनलाईन बील भरण्यास देखील सुरुवात केली आहे.
जास्त बील असणाºयांना हप्त्याने भरण्याची मुबा देण्यात येणार आहे. परंतु हप्ते कसे पाडले जातील, किती हप्ते राहतील याबाबत देखील काहीही स्पष्टता देण्यात येत नसल्याचे चित्र आहे.
नागरिकांच्या तक्रारी ऐकुण घेण्यासाठी किंवा त्यांचे समाधानकारक उत्तर देण्यासाठी वीज कंपनीच्या कार्यालयात केवळ एकाच कर्मचाºयाची नियुक्ती करण्यात आली आहे. वास्तविक दररोज नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेता या ठिकाणी दोन अधिकारी आणि दोन कर्मचाºयांची नियुक्ती करणे आवश्यक असतांना संबधितांनी दुर्लक्ष केले आहे. कर्मचारी संख्या कमी असल्याचे कारणे दिले जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये कमालीचा संताप व्यक्त केला जात आहे. आधीच जास्त वीज बील त्यात अडवणुकीचे धोरण यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.