शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

शहाद्यात 50 स्टॉलद्वारे योजनांची जनजागृती : महाराजस्व अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:36 PM

ऑनलाईन लोकमतशहादा, दि़ 24 : जिल्हा विधी सेवा प्राधीकरण, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी येथे महाराजस्व अभियानांतर्गत शासकीय सेवा व रोजगार महामेळावा घेण्यात आला. येथील बाजार समितीच्या आवारात झालेल्या या महामेळाव्यात विविध शासकीय विभागांतर्फे योजनांची माहिती देण्यासाठी सुमारे 50 स्टॉल लावण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदुरबार जिल्हा ...

ऑनलाईन लोकमतशहादा, दि़ 24 : जिल्हा विधी सेवा प्राधीकरण, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी येथे महाराजस्व अभियानांतर्गत शासकीय सेवा व रोजगार महामेळावा घेण्यात आला. येथील बाजार समितीच्या आवारात झालेल्या या महामेळाव्यात विविध शासकीय विभागांतर्फे योजनांची माहिती देण्यासाठी सुमारे 50 स्टॉल लावण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदुरबार जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे होते. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील, ए.ए. शेख, जिल्हा न्यायधीश पी.बी. गायवाड, नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, जिल्हा सरकारी वकील सुशील पंडित, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी महारू पाटील, तहसीलदार मनोज खैरनार, गटविकास अधिकारी श्रीराम कागणे, नायब तहसीलदार डॉ.उल्हास देवरे, वाय.डी. पटेल, वकील संघाचे अध्यक्ष एम.एन. पाटील आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून महामेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.या वेळी जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी म्हणाले की, न्याय मिळविण्यासाठी न्यायालये आहेत. सद्यस्थितीत न्यायालयांमध्ये अनेक खटले प्रलंबित आहेत. या खटल्यांची संख्या वाढू नये म्हणून लहान तंटे गावपातळीवर मिटवले गेले पाहिजे. त्यासाठी शासनाने गाव पातळीवर तंटामुक्त समिती स्थापन केल्या आहेत. शासकीय योजनांची गाव पातळीर्पयत माहिती नसल्याने या योजना प्रभावीपणे राबविण्यास अडचण येते. मात्र शासकीय योजनांची माहिती जनतेर्पयत पोहोचविण्यासाठी वृत्तपत्रे मोठी भूमिका बजावत आहेत. शासनाच्या सर्वच योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सामाजिक संस्था व लोकांचा सहभाग असावा. जलयुक्त शिवार, पाणी अडवा-पाणी जिरवा योजनांसाठी ग्रामपंचायतींची मोठी जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.केंद्र व राज्य शासनाने आखून दिलेल्या विविध योजनांची माहिती पात्र लाभार्थीर्पयत पोहोचली पाहिजे हा मूळ उद्देश कार्यशाळेचा असल्याचे जिल्हा व सत्र न्यायाधीश वाघवसे यांनी सांगितले. प्रास्ताविक तहसीलदार मनोज खैरनार यांनी केले. सूत्रसंचालन आशा सोनवणे यांनी तर आभार अ‍ॅड.सुशील पंडित यांनी मानले.