सिकलसेल आजारावरील उपचारासाठी निधीची तरतूद : पाडवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:31 IST2021-03-16T04:31:47+5:302021-03-16T04:31:47+5:30
कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सीमा वळवी, माजी मंत्री पद्माकर वळवी, महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, समाजकल्याण सभापती रतन ...

सिकलसेल आजारावरील उपचारासाठी निधीची तरतूद : पाडवी
कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सीमा वळवी, माजी मंत्री पद्माकर वळवी, महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, समाजकल्याण सभापती रतन पाडवी, जिल्हा परिषद सदस्य सी. के. पाडवी, जान्या पाडवी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रघुनाथ भोये, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शंकर वळवी, वैद्यकीय अधिकारी डॉ. ओंकार वळवी आदी उपस्थित होते.
प्रसंगी पालकमंत्री पाडवी यांनी सांगितले की, सिकलसेल हा अनुवंशिक आजार आहे. सुशिक्षित पिढीने तरी या आजाराविषयी जागरूक राहणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील जनतेने शासकीय आरोग्य सुविधांचा लाभ घेऊन वेळेवर उपचार घ्यावेत. आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करून नये आणि रुग्णालयातील डॉक्टरांची वेळीच सेवा घ्यावी. ग्रामीण जनतेसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, त्या माध्यमातून विविध आजारांवर उपचार करण्यात येणार आहे. कोरोना काळात डॉक्टरांनी चांगली कामगिरी केल्याचे त्यांनी सांगितले.
जि. प. अध्यक्ष ॲड. वळवी यांनी सांगितले की, आदिवासी जनतेला उपचारासाठी शहरात जावे लागते व त्यात वेळ वाया जात असल्याने जमाना येथे तज्ज्ञ डॉक्टरांना पाचारण करण्यात आले आहे.
डॉ. भोये यांनी शिबिराची माहिती दिली. शिबिरात विविध १५ आजारांवर उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांना आमंत्रित करण्यात आले असून, आवश्यकतेनुसार रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी तळोदा किंवा नंदुरबार येथे संदर्भित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिबिरात ५५० नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात येऊन औषधे देण्यात आली. तसेच मुंबईच्या स्वयंसेवी संस्थेतर्फे गरजूंना चष्मे वाटप करण्यात येणार आहे.