मोलगीत कथाकथन व निबंध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:31 IST2021-03-16T04:31:20+5:302021-03-16T04:31:20+5:30
पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार संस्थेच्या माजी अध्यक्ष कै. आईसाहेब शालिनीताई जयंत नटावदकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या स्पर्धा आयोजित ...

मोलगीत कथाकथन व निबंध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण
पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार संस्थेच्या माजी अध्यक्ष कै. आईसाहेब शालिनीताई जयंत नटावदकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
संस्थेच्या माजी अध्यक्ष कै. शालिनीताई जयंत नटावदकर यांच्या १९ व्या पुण्यस्मरणार्थ या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देणे, त्यांचा आत्मविश्वास वाढवणे हा स्पर्धा घेण्यामागील उद्देश होता. संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुहास नटावदकर यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी हा उपक्रम संस्थांतर्गत राबवला जातो; मात्र यावर्षी कोरोना महामारीमुळे हा उपक्रम तालुकास्तरीय ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्याचे ठरवले. यासाठी अक्कलकुवा तालुक्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत स्पर्धांमध्ये यश संपादन केले. निबंध स्पर्धेत रुद्रेश भटू सोनार, दिव्या राजेश जैन, संध्या रामजी पाडवी, सोनाली मानसिंग वसावे या विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकाविला. या कार्यक्रमाचे संयोजन प्राथमिक मुख्याध्यापक दिलीप नगराळे, माध्यमिक मुख्याध्यापक नटवर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल पाटील, कल्पेश मावची व अनिल गावित यांनी केले. विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण हे त्यांच्या घरी जाऊन करण्यात आले. यावेळी दिलीप नगराळे, नटवर तडवी, संजय बोरसे, राहुल पाटील, राजश्री चौधरी, शिवदास वसावे, कल्पेश मावची, ज्योती तडवी,अधीक्षक दिलीप पावरा, लोटन पावरा, अनिल गावित, दिलवरसिंग वळवी आदी उपस्थित होते.