शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

दिल्ली आंदोलनाचे कारण पुढे करीत केळी आणि पपईचे भाव घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 13:11 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा :  दिल्लीमध्ये गेल्या २० दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे व्यापाऱ्यांनीही त्याचे निम्मित पुढे केल्याने तळोदा ...

 लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा :  दिल्लीमध्ये गेल्या २० दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे व्यापाऱ्यांनीही त्याचे निम्मित पुढे केल्याने तळोदा तालुक्यातील केळी व पपई उत्पादक शेतकऱ्यांनादेखील त्याचा फटका बसत आहे. त्यामुळे भाव सातत्याने खाली येत आहेत. केंद्रशासनाने सदर आंदोलनावर ठोस कार्यवाही करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी विधेयकावरून गेल्या २० दिवसांपासून दिल्लीत शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाबाबत शेतकरी व शासन हे दोन्ही वर्ग मागे हटायला तयार नाही. त्यामुळे आंदोलनही तीव्र होत आहे. तथापि, या आंदोलनामुळे तळोदा तालुक्यातील केळी व पपई उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. कारण आंदोलनामुळे माल वाहतुकीसही अडथळा येत असल्याने नुकसानी पोटी व्यापारी माल घेण्यासाठी पुढे येत नसल्याचे शेतकरी सांगतात. ते मनमानी पद्धतीने मालाची मागणी करतात. यापूर्वी एक हजार २०० रुपये असलेला भाव ५०० ते ७०० रुपयांवर आला आहे. पपई तर पाच रुपये दराने खरेदी करीत आहेत. मालाची अशा घसरणीमुळे शेतकरी अक्षरशः वैतागला आहे. आधीच कोरोनामुळे केळी कवडीमोल भावात विकावी लागली होती. त्यानंतर दरात समाधानकारक वाढ झाली असताना त्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनाने खोडा घातला आहे. आधीच सततच्या पर्जन्यवृष्टीने सर्वच पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट आली होती. त्याच्या फटक्यातून अजूनही शेतकरी सावरलेला नाही. त्यात तो कर्जबाजारी झाला आहे. अगदी उत्पादनावर केलेला रासायनिक खते व बियाण्यांचा खर्चसुद्धा निघालेला नाही. तरीही केळी, पपईवर त्यांच्या आशा उरल्या होत्या. परंतु आंदोलनाने त्यांच्या आशेवर पूर्णतः पाणी फेरले आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचा केळी, पपईच्या माल मुख्यतः दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, हिमाचल या राज्यात व्यापारी विक्रीस नेत असतात. नेमके तेथेच आंदोलन चिघळले असल्याने गाड्यांच्या चक्का जाम असल्याचे व्यापारी सांगतात. केंद्र शासनाने तातडीने शेतकऱ्यांच्या आंदोलनावर ठोस तोडगा काढून तो मिटवावा, अशी मागणी आहे.

टरबूजवरही संक्रांतटरबूज पिकावरदेखील दर घसरणीची संक्रांत आली आहे. कारण चागल्या दर्जाच्या टरबूजला तीन रूपये दर दिला जात आहे तर कमी प्रतिचे टरबूज कोणी व्यापारी घ्यायला येत नाही, त्यामुळे असे टरबूज फुकटात देत असल्याची व्यथा शेतकरींनी बोलून दाखवली आहे. वास्तविक एकेरी ६० ते७० हजार रुपये खर्च करून तोही मिळत नसल्याने त्याच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. नुकत्याच झालेल्या बेमोसमी पावसामुळे टरबूज उत्पादक शेतकऱ्यांचे असे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय हरभरा पिकाबाबतही असेच चित्र असल्याचे म्हटले जात आहे.