शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली आंदोलनाचे कारण पुढे करीत केळी आणि पपईचे भाव घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 13:11 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा :  दिल्लीमध्ये गेल्या २० दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे व्यापाऱ्यांनीही त्याचे निम्मित पुढे केल्याने तळोदा ...

 लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा :  दिल्लीमध्ये गेल्या २० दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे व्यापाऱ्यांनीही त्याचे निम्मित पुढे केल्याने तळोदा तालुक्यातील केळी व पपई उत्पादक शेतकऱ्यांनादेखील त्याचा फटका बसत आहे. त्यामुळे भाव सातत्याने खाली येत आहेत. केंद्रशासनाने सदर आंदोलनावर ठोस कार्यवाही करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी विधेयकावरून गेल्या २० दिवसांपासून दिल्लीत शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाबाबत शेतकरी व शासन हे दोन्ही वर्ग मागे हटायला तयार नाही. त्यामुळे आंदोलनही तीव्र होत आहे. तथापि, या आंदोलनामुळे तळोदा तालुक्यातील केळी व पपई उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. कारण आंदोलनामुळे माल वाहतुकीसही अडथळा येत असल्याने नुकसानी पोटी व्यापारी माल घेण्यासाठी पुढे येत नसल्याचे शेतकरी सांगतात. ते मनमानी पद्धतीने मालाची मागणी करतात. यापूर्वी एक हजार २०० रुपये असलेला भाव ५०० ते ७०० रुपयांवर आला आहे. पपई तर पाच रुपये दराने खरेदी करीत आहेत. मालाची अशा घसरणीमुळे शेतकरी अक्षरशः वैतागला आहे. आधीच कोरोनामुळे केळी कवडीमोल भावात विकावी लागली होती. त्यानंतर दरात समाधानकारक वाढ झाली असताना त्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनाने खोडा घातला आहे. आधीच सततच्या पर्जन्यवृष्टीने सर्वच पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट आली होती. त्याच्या फटक्यातून अजूनही शेतकरी सावरलेला नाही. त्यात तो कर्जबाजारी झाला आहे. अगदी उत्पादनावर केलेला रासायनिक खते व बियाण्यांचा खर्चसुद्धा निघालेला नाही. तरीही केळी, पपईवर त्यांच्या आशा उरल्या होत्या. परंतु आंदोलनाने त्यांच्या आशेवर पूर्णतः पाणी फेरले आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचा केळी, पपईच्या माल मुख्यतः दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, हिमाचल या राज्यात व्यापारी विक्रीस नेत असतात. नेमके तेथेच आंदोलन चिघळले असल्याने गाड्यांच्या चक्का जाम असल्याचे व्यापारी सांगतात. केंद्र शासनाने तातडीने शेतकऱ्यांच्या आंदोलनावर ठोस तोडगा काढून तो मिटवावा, अशी मागणी आहे.

टरबूजवरही संक्रांतटरबूज पिकावरदेखील दर घसरणीची संक्रांत आली आहे. कारण चागल्या दर्जाच्या टरबूजला तीन रूपये दर दिला जात आहे तर कमी प्रतिचे टरबूज कोणी व्यापारी घ्यायला येत नाही, त्यामुळे असे टरबूज फुकटात देत असल्याची व्यथा शेतकरींनी बोलून दाखवली आहे. वास्तविक एकेरी ६० ते७० हजार रुपये खर्च करून तोही मिळत नसल्याने त्याच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. नुकत्याच झालेल्या बेमोसमी पावसामुळे टरबूज उत्पादक शेतकऱ्यांचे असे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय हरभरा पिकाबाबतही असेच चित्र असल्याचे म्हटले जात आहे.