मिरची उद्योगावर आले दुहेरी संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:29 IST2021-04-13T04:29:18+5:302021-04-13T04:29:18+5:30
नंदुरबार : कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनने मिरची उद्योगालाही फटका बसला आहे. आधीच अवकाळी पावसाने मिरचीचे नुकसान झालेले असताना पुन्हा ...

मिरची उद्योगावर आले दुहेरी संकट
नंदुरबार : कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनने मिरची उद्योगालाही फटका बसला आहे. आधीच अवकाळी पावसाने मिरचीचे नुकसान झालेले असताना पुन्हा यंदा कोरोनाच्या लॉकडाऊनच्या रूपाने दुहेरी संकट ओढवले आहे.
गेल्या वर्षी मार्च महिन्यातच कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाले. मिरची व्यावसायिकांचा व्यवसाय वर्षभरात केवळ तीन-चार महिन्यांचाच असतो. गेल्या वषी मजूर निघायला तयार नव्हते. कोरोनाच्या भीतीमुळे म्हणा किंवा कितीतरी लोक बाधितपण झाले. यामुळे व्यवसायावर परिणाम झाला. जो कोट्यवधींचा व्यवसाय असतो तो आता कोरोनामुळे लाखोंवर येऊन थांबला आहे.
फेब्रुवारी-मार्च ते मे असे तीन-चार महिना मिरची व्यवसाय चालतो. परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे आधीच अवकाळीचा फटका बसला आहे. यामुळे दक्षिणेकडून लाल मिरची जादा भावाने मागवावी लागली. त्यात परवडत नसताना पुन्हा गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. जिल्हा प्रशासनाने काही अटी-शर्तींवर मिरची कारखाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. परंतु मजूर येण्यासच तयार नसल्याचे विदारक चित्र आहे. मजुरांना अक्षरश: विनवण्या करून आणावे लागत आहे. त्यातील बोटावर मोजण्याएवढेच मजूर येतात. यामुळे व्यवसाय कसा करावा, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
-चेतन शहा,
मिरची उद्योजक, नंदुरबार