पालक व विद्यार्थ्यांना शिक्षण सेतू अभियानाबाबत प्रतीक्षाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:20 IST2021-06-30T04:20:02+5:302021-06-30T04:20:02+5:30
दरम्यान, शाळा बंद असतानाही कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून भौतिक स्वरूपात शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य गावपातळीवर पुरवणे, ...

पालक व विद्यार्थ्यांना शिक्षण सेतू अभियानाबाबत प्रतीक्षाच
दरम्यान, शाळा बंद असतानाही कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून भौतिक स्वरूपात शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य गावपातळीवर पुरवणे, तसेच जेथे शिक्षकांमार्फत सेवा पुरवणे शक्य नाही, तेथे शिक्षण मित्राच्या साहाय्याने सेवा पुरवणे, शक्य तेथे ऑनलाईन पद्धतीने पूरक शिक्षण देणे, पूरक पोषण आहार विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी विशेष उपाययोजना करणे या गोष्टी या अभियानांतर्गत राबवण्यात येणार असल्याने पालक, विद्यार्थ्यांमध्ये निश्चिंतता होती. परंतु जून महिना संपला तरी प्रकल्प कार्यालय येथून आलेल्या सर्व शैक्षणिक सामग्रीची मानांकन प्रक्रिया पूर्ण होऊन सॉफ्ट कॉपी स्वरूपात सामग्री प्रत्येक प्रकल्प पातळीवर पोहोचवणे, प्रकल्प पातळीवर आवश्यकतेनुसार मुद्रण करून घेऊन शैक्षणिक साहित्य पालक संस्थेकडे पोहोचवणे, शिक्षण मित्र निवड प्रक्रिया, शिक्षण मित्र प्रशिक्षण पूरक पोषण आहार पोहोचवणे, या बाबींबाबत अद्यापही प्रतीक्षाच असल्याने पालक, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात २७ जूनपासून सकाळी पाच वाजेपासून ते पुढील आदेश होईपर्यंत संचारबंदी, जमावबंदी आदेश लागू करण्यात आल्याने सध्या तरी शाळा, महाविद्यालये अनिश्चित काळासाठी बंद राहणार असल्याने ‘शिक्षण सेतू अभियान’ राबवण्याबाबत संबंधित विभागाने गांभीर्याने घ्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
रोजंदारी कर्मचाऱ्यांचा बिऱ्हाड मोर्चा
शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहात रोजंदारीवर काम करणाऱ्या वर्ग तीन व वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करावे, या मागणीसाठी २८ तारखेपासून राज्यव्यापी बिऱ्हाड मोर्चा पुन्हा सुरू होणार असून, याबाबत कृती समितीने मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे.