ठरलेल्या दरानेच पपई विक्री करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 13:05 IST2020-02-07T13:05:22+5:302020-02-07T13:05:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : पपई फळाची टंचाई पाहता उत्तर भारतातील बाजारात दिवसेंदिवस भाववाढ होत आहे. परंतु शेतकऱ्यांना त्यामानाने ...

ठरलेल्या दरानेच पपई विक्री करावी
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : पपई फळाची टंचाई पाहता उत्तर भारतातील बाजारात दिवसेंदिवस भाववाढ होत आहे. परंतु शेतकऱ्यांना त्यामानाने कमी भाव मिळत असल्याने पपई उत्पादक शेतकरी संघर्ष समिती, व्यापारी व कृषी उत्पन्न बाजार समिती यांची संयुक्त बैठक येथे पार पडली. बैठकीत आठवड्याचा सरासरी भाव काढत १३ रुपये ५१ पैसे दर निश्चित करण्यात आला. शेतकऱ्यांनी या दरानुसारच पपईची तोडणी करावी, असे आवाहन संघर्ष समितीतर्फे करण्यात आले.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, सचिव संजय पाटील, पपई उत्पादक संघर्ष समितीचे सदस्य भगवान पाटील, अनिल पाटील, राजू पाटील, विश्वनाथ पाटील, फुलभाई पाटील आदींसह शिरपूर, नंदुरबार, तळोदा परिसरातील शेतकरी व व्यापारी शेख नाजीम सरताज, हाजी इकबाल, प्रकाशभाई राजस्थानवाले, राहुलभाई राजस्थानवाले, अहमद नाजिम आदी व्यापारी प्रतिनिधींची पपईच्या दरवाढीबाबत चर्चा झाली. चर्चेअंती १३ रुपये ५१ पैसे दर निश्चित करण्यात आला. अतिवृष्टीमुळे पपईच्या बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. फळधारणाही किमान झाली. जिल्ह्यात पपईचे मोठ्या प्रमाणावर क्षेत्र आहे. पपई पिकावर व्हायरससह डाऊनीमुळे उत्पादनात ५० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. दररोज जिल्ह्यातून पपईच्या सरासरी शंभर गाड्या जात होत्या. ती संख्या सध्या निम्म्याहून अधिक कमी झाली आहे. गेल्या आठवड्यातही संयुक्त बैठक झाली होती. त्या बैठकीत ११ रुपये ७५ पैसे भाव ठरविण्यात आला होता. परंतु उत्तर भारतातील बाजारपेठेत वाढणारा भाव पाहता संघर्ष समितीने पुन्हा पुढाकार घेत आठवड्याचा सरासरी भाव काढून शेतकºयांना भाववाढ मिळवून दिली.
दरम्यान, कधी दोन रुपये तर कधी पाच रुपये प्रतीकिलो या दराने आजपर्यंत पपई उत्पादक शेतकरी पपई फळाची विक्री करीत होता. परंतु यंदा प्रथमच पपईला चांगला भाव मिळत आहे. तरीही पपई पिकावर झालेला खर्च व मिळणारे अपेक्षित उत्पादन पाहता भाव वाढ समाधानकारक नसल्याचे शेतकरी सांगतात. शेतकºयांना बाजारपेठेतील दराची माहिती नसल्याने नुकसान होते. महानगरांमध्ये ३५ ते ४० रुपये किलोप्रमाणे पपईची विक्री सुरू आहे. त्यामुळे पपईला प्रतीकिलो १५ रुपयेप्रमाणे दर मिळावा, अशी अपेक्षा शेतकºयांकडून व्यक्त होत आहे. सध्या व्यापाºयांनी ठरवलेल्या दरापेक्षा खुल्या बाजारात १५ रुपयेप्रमाणे काही व्यापारी पपई खरेदी करत असल्याचे बोलले जात आहे.