पपईचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 12:41 IST2019-12-30T12:41:10+5:302019-12-30T12:41:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : भारतभरात पपई पुरवठा करणाºया नंदुरबार जिल्ह्यात परराज्यातील व्यापारी दाखल झाले आहे. ते शेतकऱ्यांकडून पपई ...

पपईचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : भारतभरात पपई पुरवठा करणाºया नंदुरबार जिल्ह्यात परराज्यातील व्यापारी दाखल झाले आहे. ते शेतकऱ्यांकडून पपई खरेदी करीत आहे. परंतु अवघ्या २० दिवसात पाच रुपये प्रकिकिलोने भाव घसरले आहे. त्यामुळे शेतकºयांमधून नाराजीचा सुरू उमटू लागला आहे.
पपई उत्पादनाबाबत नंदुरबार हा आघाडीवरील जिल्हा म्हणून गणला जात आहे. या जिल्ह्यातील पपई केवळ महाराष्टÑातच नव्हे तर राजस्थान, पंचाव, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली व उत्तरांचल तर दक्षिणेकडील केरळ, तामिळनाडू व आंध्रप्रदेश आदी राज्यांमधील व्यापाºयांकडून खरेदी करण्यात येत असते. दरवर्षीप्रमाणे यंदाही तेथील पपई विक्रेते तथा व्यापारी नंदुरबार जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यात नंदुरबार तालुक्यातील शिंदे, कोळदा, सुजालपूर, बोराळा, हाटमोहिदा, लहान शहादे, कोरीट, खोडसगाव, पळाशी, बामडोद तर शहादा ताुक्यातील म्हसावद, चिखली, वैजाली या गावांमध्ये व्यापरी दाखल झाले आहे. त्यांच्याकडून पपईची खरेदी शेतावरच करण्यात येत आहेत. ही खरेदी-विक्री मागील महिन्याच्या अखेरीस सुरू झाली आहे.
सुरुवातीला जागेवरच पपई खरेदी करतांना व्यापाºयांकडून २३ रुपये प्रतिकिलोला भाव दिला जात होता. परंतु जसजसे पपई काढण्याचा ओघ वाढला तसतसा व्यापाºयांकडून पपईचे भाव कमी करण्यात आले आहे. केवळ २० दिवसाच्या कालावधीतच सात रुपयांनी दर घसरले असून सद्यस्थितीत जागेवरच १६ रुपये प्रतिकिलोला भाव दिले जात आहे. पाच दिवसातच पाच रुपयांनी भाव घसरल्याने शेतकºयांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.