शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Dabholkar Case: मोठी बातमी! अखेर डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला; अंदुरे, कळसकरला जन्मठेप
2
‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, त्यांना सन्मान द्या, तसं न झाल्यास...’ मणिशंकर अय्यर यांचं विधान 
3
“PM मोदींमुळे हिरे व्यापाराला चालना, जागतिक बाजारपेठेत भारताचे भवितव्य आशादायी”: पीयूष गोयल
4
'ठाकरेंना अडचणीत आणणारं शपथपत्र द्या'; देशमुखांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, 'त्यांचा निरोप...'
5
डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला: "हत्येच्या गुन्ह्याचे समर्थन चुकीचे, तपास अधिकाऱ्यांचा निष्काळपणा" न्यायालयाचे निरीक्षण
6
'५ वर्षांसाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार'; खासदार अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय
7
SSY Vs SIP: सुकन्या समृद्धी की एसआयपी, कोणती स्कीम तुमच्या मुलीसाठी जमवेल अधिक पैसा? जाणून घ्या
8
विरोधकांचा आरोप करण्याचा स्तर ढासळला, आम्ही त्यांना.., एकनाथ शिंदेंचं प्रियंका चतुर्वेदी आणि ठाकरे गटाला प्रत्युत्तर 
9
दलजीत कौरच्या भांगेत सिंदूर? दुसऱ्या पतीसोबतही घटस्फोट झाल्याची होती चर्चा
10
Parshuram Jayanti 2024: परशुरामांना कोकणचा देव का मानतात? आदिलशहाने त्यांचे मंदिर का बांधले? वाचा!
11
Parshuram Jayanti 2024: भगवान परशुराम यांच्या दिव्य कार्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? सविस्तर वाचा!
12
प्राजक्ताने केलेल्या 'त्या' सहीचा उलगडा झालाच! अक्षय्य तृतीयेला नव्या चित्रपटाची शानदार घोषणा
13
Akshaya Tritiya च्या मुहूर्तावर Gold महागलं, चांदीही ८५००० रुपयांपार; जाणून घ्या आजचा भाव
14
भाजपा आमदार सुरेश धस यांचं धमाकेदार भाषण; घरफोडीवरून शरद पवार, रोहित पवारांना सुनावलं
15
हैदराबादच्या राणीची मेट गालामध्ये हवा; ८३ कोटींचा ड्रेस परिधान करुन रेड कार्पेटवर केली एन्ट्री
16
SBI Share Target Price : ₹१००० पर्यंत पोहोचणार SBI चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले, "खरेदी...."
17
गजकेसरीसह अक्षय्य तृतीयेला अद्भूत योग: ६ राशींना लाभ, लक्ष्मीची अक्षय्य कृपा; शुभच होईल!
18
भाजपने मोदींच्या बाजूला औरंगजेबाचा फोटो लावावा; 'त्या' विधानावरून संजय राऊत संतापले
19
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
20
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा

‘डावणी’च्या प्रादुर्भावाने पपई उत्पादक चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 12:06 PM

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील शेतक:यांनी मोठय़ा प्रमाणावर पपईची लागवड केली आहे. सध्या पपईला फळधारणा होत असून फळधारणेच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील शेतक:यांनी मोठय़ा प्रमाणावर पपईची लागवड केली आहे. सध्या पपईला फळधारणा होत असून फळधारणेच्या कालावधीत ‘डावणी’ नावाच्या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत असल्याने पपईची फुलगळ होत आहे. फळधारणेवर त्याच्या परिणाम होत असल्याने आधीच संकटात सापडलेल्या शेतक:यांना कृषी विभागान मार्गदर्शन करण्याची गरज आहे.पपई या पिकासाठी उत्पन्न निघेर्पयत मोठय़ा प्रमाणावर खर्च करावा लागतो. यावर्षी शेतक:यांनी 14 रुपयांपासून  ते 25 रुपयार्पयत पपईच्या रोपांची  खरेदी  करून लागवड केली आहे. शिवाय उन्हाच्या तीव्रतेने ‘मर’ रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे तीन ते चारवेळा रोपे आणून पुन्हा लागवड करावी लागली. त्याला उन्हाच्या संरक्षणापासून क्रॉप कव्हर लावण्यात आले. ते क्रॉप कव्हर प्रती झाड तीन ते चार रुपये खर्च आला. तसेच महागडे रासायनिक खत वेगवेगळ्या कंपन्यांचे स्प्रे त्यात व्हायरस मिलीबगसारख्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने सहाजिकच खर्चाचे प्रमाण वाढले. दरवर्षी पपईचा दर कमी-अधिक प्रमाणात होत असल्याने दर कमी झाल्यावर शेतक:याला मोठी आर्थिक झळ सोसावी लागते. त्यामुळे हे पीक परवडेनासे झाले आहे. पपईचे पीक दरवर्षी वादाच्या भोव:यात सापडते. कधी व्यापा:यांकडून कमी दर दिला जातो तर कधी नैसर्गिक संकट यावर्षी सुरुवातीलाच निसर्गाच्या संकटाने शेतकरी हैराण झाला असून कसेबसे उधारउसनवार पैसे करून पीक घेत आहेत. काही शेतक:यांनी तर कूपनलिका आटल्याने उभे पीक मोडून काढले. ज्या शेतक:यांचे पपईचे पीक  तग धरून उभे आहे त्यावर सध्या ‘रिक्षा’ नावाच्या किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मार्गदर्शनाची गरज आहे. कृषी विभागाने गावोगावी बैठका घेऊन मार्गदर्शन केले पाहिजे, अशी मागणी शेतक:यांकडून होत आहे.ज्या शेतक:यांनी एप्रिल महिन्यात पपईची लागवड केली आहे हे ते पीक  सध्या फळधारणेच्या अवस्थेत आहे. त्या पिकाला सध्या ‘डावणी’ रोगाने                पछाडले आहे. यात झाड पिवळे पडणे, झाडाची छत्री बारीक होणे, कोरडी पडणे आदी प्रकार घडत आहेत. पपई पीक हे मुख्यत: पानांच्या छत्रीवरच अवलंबून असते. या पिकात पानांची छत्री गेल्यास झाडच कमकुवत होते. त्यामुळे उन्हाळ्यात सावली नसल्याने फळांवर उष्णतेचे चटके बसल्याने फळ खराब होऊन आर्थिक नुकसान होते. शिवाय व्यापारीहीही माल घेत नसल्याने शेतक:यांचे नुकसान होते. कृषी विभागाने वेळीच दखल घेऊन समस्यांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात.