कोरोनाच्या संकटावर मात करीत बळीराजा नव्या उमेदीने सरसावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 13:21 IST2020-05-03T13:21:01+5:302020-05-03T13:21:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर शहादा व परिसरात अद्याप पपई फळांची तोडणी झाली नसताना खचून ...

Overcoming the crisis of Corona, Baliraja came forward with new hope | कोरोनाच्या संकटावर मात करीत बळीराजा नव्या उमेदीने सरसावला

कोरोनाच्या संकटावर मात करीत बळीराजा नव्या उमेदीने सरसावला

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर शहादा व परिसरात अद्याप पपई फळांची तोडणी झाली नसताना खचून न जाता पुढील हंगामासाठी रणरणत्या उन्हात पपईची लागवड करण्यासाठी बळीराजा पुढे आला आहे. परिस्थिती कशीही असो आपण आपले काम नित्यनियमाने करीत ‘थांबला तो संपला’ असा संदेश बळीराजा आपल्या कर्तृत्वातून देत आहे.
खान्देशात पपईचे सर्वाधिक उत्पादन शहादा तालुक्यात घेतले जाते. येथे उत्पादीत झालेली पपई उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात विक्री होते. त्याचप्रमाणे पपईच्या उत्पादनातून हमखास उत्पादन मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल पपई लागवडीकडे वाढला आहे. दरवर्षी पपईच्या दरामुळे पपई उत्पादक शेतकरी व खरेदीदार व्यापारी यांच्यात संघर्ष होतो. मात्र संपूर्ण लागवड झालेली पपई विक्री होते. यंदा कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे देशात केंद्र शासनाने १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केल्याने माल वाहतूक सेवा बंद आहे. पपईचे पीक शेतात तयार आहे मात्र वाहतूक बंदीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे. अशा परिस्थितीत काही प्रमाणात वाहतूक सेवा सुरळीत झाल्याने पपईची तोडणी सुरू आहे. मात्र कमी दरामुळे शेतकरी नाराज आहेत. यामुळे पुढील हंगामात परिसरात पपईची लागवड होते किंवा नाही अशी शंका अनेक व्यापाºयांसह शेतकºयांनी व्यक्त केली होती.
साधारणत: एप्रिल महिन्यात पपई रोपांची लागवड केली जाते. पाण्याची व्यवस्था म्हणून ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करण्याकडे शेतकºयांचा कल वाढला आहे. यासह एप्रिल-मे महिन्यात तापमानात कमालीची वाढ होते व अक्षयतृतीयेनंतर वाºयाचा वेगही वाढलेला असतो. वाढत्या तापमानापासून तसेच वाºयापासून रोपांना वाचविण्यासाठी पपई रोपांची लावणी केल्यानंतर त्याच्या संरक्षणासाठी विशेष प्लास्टिकचा वापर करून रोपांचे संरक्षण केले जाते. त्यानंतर फळधारणापर्यंत कुठल्याही रोगाची लागण होऊ नये यासाठी कीटकनाशकांचा वापर करण्यासह औषध फवारणी करून देखभाल केली जाते. एकंदरीत रोप विकत घेण्यापासून त्याची लागवड झाल्यानंतर वर्षभर देखभाल करून त्यानंतर परप्रांतीय व्यापाºयांकडून त्याची होणारी खरेदी हा संपूर्ण वर्षभराचा प्रवास सुरू असताना दराबद्दल व्यापाºयांकडून शेतकºयांची होणारी पिळवणूक या साºया संघर्षात पुढील हंगामासाठी परिसरातील बळीराजा सज्ज झाला आहे.

Web Title: Overcoming the crisis of Corona, Baliraja came forward with new hope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.