अक्कलकुवा तालुक्याच्या दुर्गम भागात होतोय सेंद्रीय शेतीचा जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 12:29 IST2020-02-04T12:28:54+5:302020-02-04T12:29:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : सातपुड्यातील दुर्गम भागातील गावांमध्ये शेतकऱ्यांकडून सेंद्रीय शेतीचा अवलंब करण्यात येत असून यातून सेंद्रीय भाजीपाला ...

अक्कलकुवा तालुक्याच्या दुर्गम भागात होतोय सेंद्रीय शेतीचा जागर
लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा : सातपुड्यातील दुर्गम भागातील गावांमध्ये शेतकऱ्यांकडून सेंद्रीय शेतीचा अवलंब करण्यात येत असून यातून सेंद्रीय भाजीपाला उत्पादन घेतले जात आहे़ शेतकऱ्यांच्या या प्रयत्नांमुळे तालुक्यात सेंद्रीय भाजीपाल्याची बाजारपेठ आकारास येत आहे़
सातपुड्यात सुरु असलेल्या सेंद्रीय शेतीला बळ देण्यासाठी बेडाकुंड येथे कृषी जागृती चलो गाव की ओर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़ यात १०० पेक्षा अधिक शेतकºयांनी सहभागी होऊन सेंद्रीय शेतीतील बारकावे शिकून घेतले़ यावेळी सेंद्रीय शेतीबाबत राजेंद्र वसावे यांनी शेतकºयांना मार्गदर्शनक केले़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिल जावरे होते़ प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उत्तर प्रदेश येथून जैविक शेतीचा प्रचार प्रसार करणारे ओम कुमार , मिºया वळवी, सुपा वळवी, भरत पाडवी, योगेश्वर बुवा, रामजी पाडवी, संजय वळवी, नारसिंग वळवी, कविताबाई वळवी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना राजेंद्र वसावे यांनी सेंद्रीय शेतीची सुरुवात ही नवीन सुदृढ भारताची सुरुवात आहे़ जैविक शेतीकडे भविष्यात सर्वच शेतकरी वळतील रासायनिक शेती पर्यावरण व सजीवांच्या जीवनात धोका ठरू लागली आहे. सातपुड्यातील जैविक शेती ही सर्वांसाठी आदर्श ठरेल असा विश्वास व्यक्त केला़ कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी सेंद्रीय शेती करण्याचे फायदे आणि त्यासाठी लागणाºया विविध घटकांबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले़
बेडाकुंड येथील मिºया वळवी, सुपा वळवी य त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने जैविक शेतीसाठी पुढाकार घेत भाजीपाला उत्पादन सुरु केली होते़ त्यांचा कित्ता इतर शेतकºयांनी गिरवत या भागात मोठ्या प्रमाणाव सेंद्रीय शेतीला सुरुवात झाली आहे़ यांतर्गत फुलकोबी, पाणकोबी, मेथी ,कोथिंबीर ,कांदे, लसूण, टमाटे, वांगी या भाजीपाला पिकांची लागवड करुन उत्पादन घेतले जाते़ या उत्पादनाला मोलगी, अक्कलकुवा आणि नंदुरबार येथे विक्रीसाठी पाठवले जात आहे़ यातून शेतकºयांना बारमाही पैसे मिळू लागल्याने शेतकºयांच्या दैनंदिन आवकचा प्रश्न मार्गी लागला आहे़