कोरोना महामारीवर संत्री, मोसंबी,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:28 IST2021-04-13T04:28:54+5:302021-04-13T04:28:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गेल्या चार महिन्यात संत्रे, मोसंबीच्या दरात साधारण २० ते ३० रुपयांची वाढ झाली आहे. ...

कोरोना महामारीवर संत्री, मोसंबी,
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गेल्या चार महिन्यात संत्रे, मोसंबीच्या दरात साधारण २० ते ३० रुपयांची वाढ झाली आहे. कोरोना महामारीवर संत्रे, मोसंबी, लिंबू हे उपयुक्त असल्याचे मानले जाते. या काळात या फळांचा रसच नव्हे तर पूर्ण फळ खा, असा सल्ला तज्ज्ञ देतात.
संत्रे, मोसंबी यांच्या दरात गेल्या महिन्याच्या तुलनेत या महिन्यात वाढ झाली आहे. संत्रे १५० ते १६० रुपये किलो, मोसंबी १२० ते १४० रुपये किलो दराने विक्री होत आहे.
मुंबईचा माल व्हाया जळगावहून मागवला जातो
नंदुरबार शहरात साधारण १०-१२ घाऊक विक्रेते आहेत. ते संत्रे, मोसंबी हा माल मुंबईहून मागवतात. परंतु, हाच माल मुंबईहून आधी जळगावला जातो. मग जळगावहून हा सर्व माल नंदुरबारच्या बाजारपेठेत घाऊक विक्रेत्यांकडे येतो. यानंतर पुढे किरकोळ विक्री करणारे विक्रेते हा माल उचलतात. त्यानंतर तो ग्राहकांपर्यंत पोहोचतो. शहरात दररोज २०० बॉक्स अर्थात सुमारे अडीच-तीन हजार क्विंटल मालाची विक्री होते.
तज्ज्ञ म्हणतात...
सद्यस्थितीत संत्री, मोसंबी अशा काही लिंबूवर्गीय फळांचा केवळ रस घेण्यापेक्षा पूर्ण फळ खाणे योग्य राहील. कारण या फळांमध्ये व्हिटॅमिन सी असते. जे शरिराला आवश्यक असते. जशी आपल्या आहारात फळे घेतो, तशी ती नियमितपणे घ्यावी. आपल्या येथे जी फळे पिकतात ती उदा. पेरू, आवळा, करवंद अशा काही फळांमध्ये थोड्याफार प्रमाणात व्हिटॅमिन असतात. या फळांची आपल्याला सवय असते आणि ती आपल्यासाठी फायदेशीर असतात. सध्याच्या हंगामानुसार संत्री, मोसंबी अशा लिंबूवर्गीय फळांना स्थान राहील. पण असे काही नाही की फक्त तीच घेतली पाहिजेत. कारण निसर्गाने त्या हंगामानुसार ती फळं बनवलेली असतात. त्यामुळे त्या ऋतूत येणारी सर्व फळं ही गुणकारी आहेत. पण या फळांना वरचा क्रम राहील. आवळादेखील तितकाच गुणकारी आहे.
- डॉ. वैशाली चव्हाण, होमिओपॅथी तज्ज्ञ व समुपदेशक, नंदुरबार