नंदुरबार जिल्ह्यात ‘उज्जवला’ योजनेंतर्गत फक्त 800 कनेक्शन वाटप
By Admin | Updated: May 21, 2017 17:15 IST2017-05-21T17:15:04+5:302017-05-21T17:15:04+5:30
प्रधानमंत्री ‘गॅस’ योजना गैरसमजात अडकली

नंदुरबार जिल्ह्यात ‘उज्जवला’ योजनेंतर्गत फक्त 800 कनेक्शन वाटप
नंदुरबार,दि.21- केंद्रशासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेत नंदुरबार जिल्ह्याच्या सर्व सहा तालुक्यातून केवळ 20 हजार दारिद्रय़रेषेखाली महिलांनी अर्ज आहेत़ राज्यातील सर्वात कमी गॅस कनेक्शन असलेला दुस:या क्रमांकाचा जिल्हा अशी ओळख निर्माण झालेल्या नंदुरबार जिल्ह्यात उज्जवला योजनेला अल्प प्रतिसाद मिळत असल्याने चिंता वाढल्या आहेत़
जिल्ह्यात दारिद्रय़ रेषेखालील शिधापत्रिकांची संख्या तब्बल दोन लाख 10 हजार असताना, सहा महिन्यात 20 हजार अर्ज आले आहेत़ उज्जवला योजनेंतर्गत गॅस कनेक्शन घेतल्यास यादीतून नाव वगळले जाईल, असा समज दारिद्रय़ रेषेखालील महिलांमध्ये निर्माण झाला आह़े या गैरसमजामुळे गेल्या सहा महिन्यात कंपन्यांचे 10 हजार कनेक्शन वाटपाचे ‘टार्गेट’ असताना त्यांना केवळ 800 कनेक्शन वाटप करता आले आहेत़
2011 साली तयार करण्यात आलेल्या दारिद्रय़रेषेखालील नागरिकांच्या याद्यांमध्ये समाविष्ट अशा महिलांना या योजनेचा प्रामुख्याने लाभ देण्यात येत आह़े या महिलांच्या याद्या केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या इंडियन ऑईल कंपनी, हिंदूस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियमच्या नंदुरबार जिल्ह्यातील डिलर्सना देण्यात आली आह़े या याद्यांनुसार गेल्या सहा महिन्यात 800 लाभार्थी महिलांना गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले आह़े
कनेक्शन वाटपासाठी नंदुरबार जिल्ह्यातील इंडियन ऑईल कंपनीचे 11, हिंदूस्थान पेट्रोलियमचे तीन आणि भारत पेट्रोलियम कंपनीने नियुक्त केलेल्या एका गॅस वितरकावर जबाबदारी नेमण्यात आली आह़े त्यांच्याकडून गेल्या सहा महिन्यात विविध शिबिरे आणि जनजागृतीपर बैठकांद्वारे या योजनेची माहिती देण्यात येत आह़े केंद्रशासनाकडून 1 हजार 600 रूपयांचे भांडवल गॅस सिलींडर आणि शेगडी खरेदीला सर्वाधिक पसंती देण्यात आली आह़े यामुळे एक रूपयाही खर्च न करता दारिद्रय़रेषेखालील महिलांना हा गॅस मिळणार आह़े
नंदुरबार जिल्ह्यात एकूण तीन लाख 30 हजार 147 शिधापत्रिकाधारक आहेत़ त्यावर 15 लाख 71 हजार 298 नागरिक आहेत़ यात दोन लाख 10 हजार 279 शिधापत्रिका ह्या दारिद्रय़ रेषेखालील तर 83 हजार 253 केशरी व सात हजार 152 शिधापत्रिका ह्या शुभ्र आहेत़ जिल्ह्यात तीन केंद्रशासन पुरस्कृत गॅस कंपन्यांकडून तीन लाख शिधापत्रिकाधारकांपैकी केवळ 1 लाख 10 हजार गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले आहेत़ हे सर्व गॅस कनेक्शन पांढ:या आणि केशरी शिधापत्रिकाधारकांना देण्यात आले आहेत़ त्यामुळे जिल्ह्यात दारिद्रय़ रेषेखालील नागरिक हे गॅस कनेक्शन विनाच आहेत़
एकूण शिधापत्रिकांपैक दारिद्रय़ रेषेखालील दोन लाख नागरिक आजही गॅस कनेक्शनअभावी असल्याने उज्ज्वलाअंतर्गत त्यांना शेगडी आणि सिलींडर देण्यासाठी संबधित कंपन्या प्रयत्नशील आहेत़
संबधित कंपन्यांकडून दारिद्रय़रेषेखालील प्रत्येक कुटूंबांच्या नावांची तपासणी करण्यात येऊन गॅस कनेक्शन नसलेल्या घरातील महिलेच्या नावाले अर्ज तयार करण्याची प्रक्रिया राबवण्यात येत आह़े