शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

केवळ 14 टक्के शेतक:यांनाच पीककर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 11:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पावसाअभावी दुष्काळात तेरावा महिना भोगणा:या शेतक:यांना राष्ट्रीयकृत बँकांच्या विविध शाखांनी कर्जासाठी ताटकळत ठेवल्याने त्यांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पावसाअभावी दुष्काळात तेरावा महिना भोगणा:या शेतक:यांना राष्ट्रीयकृत बँकांच्या विविध शाखांनी कर्जासाठी ताटकळत ठेवल्याने त्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आह़े नियोजनाचा अभाव आणि ढिसाळ अशा कामकाजामुळे राष्ट्रीयकृत बँका जून महिना संपूनही केवळ 14 टक्के शेतक:यांना कजर्वाटप करु शकल्या आहेत़      एकीकडे राष्ट्रीयकृत बँका शेतक:यांना कर्जापासून वंचित ठेवत असताना दुसरीकडे जिल्हा बँकेने 97 टक्के पात्र खातेदारांना 41 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करुन 73 टक्के मजल मारली आह़े विशेष म्हणजे जिल्हा बँकेचे कर्ज वाटप हे एप्रिल अखेरीपासून सुरु झाले होत़े तर राष्ट्रीयकृत बँकाना मे महिन्यापासून कजर्वाटप करण्यात आदेश होत़े परंतू शेतक:यांची कजर्माफी आणि इतर बाबींच्या त्रुटी काढून राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतक:यांच्या कर्ज प्रस्तावांवर शेरे मारणे सुरु असल्याने कजर्वाटपाची गती संथावली आह़े जिल्ह्यातील 25 हजार पेक्षा अधिक शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेसाठी पात्र ठरले होत़े यातून त्यांचा पीककर्जासाठीचा मार्गही मोकळा झाला होता़ यंदाच्या खरीप हंगामासाठी लीड बँकेने 9 राष्ट्रीयकृत, तीन खाजगी आणि दोन सहकारी बँकांना 72 हजार शेतक:यांना कर्ज वाटप करण्याचे उद्दीष्टय़ दिले होत़े परंतू जून संपल्यानंतरही बँकांनी केवळ 10 हजार शेतक:यांना कर्ज पुरवठा केल्याचे समोर आले आह़े जिल्ह्यातील विविध भागातील 9 राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखांमधून 44 हजार, खाजगी बँकांकडून 6, ग्रामीण बँकेंकडून 1 हजार तर सहकारी बँकेने किमान 5 हजार शेतक:यांना कर्ज वाटप करण्याचे लीड बँकेने मे महिन्यात उद्दीष्टय़ वाटप करताना स्पष्ट करुनही राष्ट्रीयकृत बँकांच्या संथगतीने होणा:या कजर्वाटपाला गती मिळणार कधी असा, प्रश्न समोर येत आह़े गेल्या जून महिन्यात खाजगी बँकांनी 39 तर ग्रामीण बँकेनेही 17 टक्के शेतक:यांर्पयतच पीककर्जा पोहोचवल्याची माहिती देण्यात आली आह़े 

खरीप 2019 मध्ये 58 हजार 334 शेतक:यांना उर्वरित 14 हजार 582 शेतक:यांना रब्बी हंगामात पीक कर्ज वाटप करण्याचे नियोजन होत़े खरीप हंगामातील कर्जातून 1 लाख 1 हजार 788 हेक्टर शेतीक्षेत्राला लाभ मिळणार असल्याचे स्पष्ट झाले होत़े प्रत्यक्षात मात्र जून अखेर्पयत बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांच्याकडून जिल्ह्यातील 4 हजार 165 शेतक:यांना 74 लाख 87 हजार रुपयांचे पीककर्ज वाटप झाले आह़े जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांकडून अक्कलकुवा तालुक्यातील 8 हजार 914, धडगाव 5 हजार 619, नंदुरबार 17 हजार 799, नवापूर 12 हजार 391, तळोदा 6 हजार 546 तर शहादा तालुक्यात सर्वाधिक 21 हजार 647 अशा 72 हजार 916 शेतक:यांना 2019-20 या वर्षात पीककर्ज देण्याचे नियोजन केले गेले होत़े 

राष्ट्रीयकृत आणि खाजगी बँकांकडून शेतकरी कर्ज वाटपाबाबत उदासिन भूमिका घेतली गेली असताना धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पात्र असलेल्या 5 हजार 539 शेतकरी सभासदांपैकी 5 हजार 329 शेतक:यांना 41 कोटी 93 लाख 11 हजार रुपयांचे कर्जाचे वाटप करण्यात आले आह़े यातून 8 हजार 305 हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले आह़े आजअखेरीस जिल्ह्यातील केवळ 210 सभासद शेतकरी कर्जापासून वंचित असून त्यांनाही जिल्हा बॅकेच्या 29 शाखांमधून कर्ज वितरण होणार असल्याची माहिती आह़े बँकेकडून शहादा सर्वाधिक 2 हजार, नंदुरबार 1 हजार 739, तर नवापुर तालुक्यातील 817 शेतक:यांना कर्ज वाटप झाले आह़े 235 पैकी 220 विकासोंना कर्ज दिले गेले आह़े