चार रस्त्यांवर वन-वे चे बोर्ड, अंमलबजावणी मात्र कुठेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:59 IST2021-02-21T04:59:58+5:302021-02-21T04:59:58+5:30

नंदुरबार : शहरातील वन वे चा फज्जा उडालेला आहे. केवळ वाहतूक पोलिसांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अशा ठिकाणी उभे ...

One-way boards on four roads, but no implementation | चार रस्त्यांवर वन-वे चे बोर्ड, अंमलबजावणी मात्र कुठेच नाही

चार रस्त्यांवर वन-वे चे बोर्ड, अंमलबजावणी मात्र कुठेच नाही

नंदुरबार : शहरातील वन वे चा फज्जा उडालेला आहे. केवळ वाहतूक पोलिसांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अशा ठिकाणी उभे राहून त्याची अंमलबजावणीचा प्रयत्न केला जातो. शहरात चार रस्त्यांवर वन वे आहे. परंतु सद्य:स्थितीत एकाही ठिकाणी अंमलबजावणी होत नसल्याची स्थिती आहे.

नंदुरबारातील रस्ते आधीच अरुंद, त्यात अतिक्रमण कमालीचे वाढले आहे. वाहनांची संख्या देखील वाढल्याने रहदारीचा नेहमीच बोजवारा उडालेला आहे. अशा स्थितीत काही वर्षांपूर्वी नंदुरबारातील चार रस्त्यांवर वन वे करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु त्याची अंमलबजावणी तेव्हढ्यापुरतीच मर्यादित राहत आली आहे. अशीच स्थिती समविषम पार्किंगचीदेखील आहे.

शास्त्री मार्केट रस्ता

शास्त्री मार्केट रस्त्यावर पिंजारी विहीर ते मार्केट तसेच शाळा क्रमांक एक ते मार्केट शिवाय सरळ जुने कोर्ट असा एकेरी मार्ग निश्चित करण्यात आला होता. काही काळ या ठिकाणी अंमलबजावणी झाली. परंतु हा मध्यवर्ती भाग असल्याने येथे वन वे यशस्वी झाला नाही. त्यामुळे वाहतूक शाखेने त्याचा नाद सोडून दिल्याचे चित्र आहे.

जळका बाजार

n जळका बाजार ते सोनाट खुंट हा रस्ता देखील चार चाकी वाहनांसाठी वन वे आहे. त्यासाठीचे बोर्ड वाहतूक शाखेेने जळका बाजारात लावले देखील आहेत. परंतु या रस्त्यावर वाहतूक पोलिसांना जेंव्हा आठवण येते तेंव्हा तेथे उभे राहून केवळ दंड आकारणीसाठी अंमलबजावणी केली जाते.

साक्रीनाका

साक्रीनाका ते जळका बाजार व साक्री नाका ते धोशातकीया हा रस्ता देखील वन वे करण्यात आला होता. हे दोन्ही रस्ते अतिशय अरुंद आहेत. एकाच वेळी दोन चारचाकी वाहने निघणे म्हणजे मोठी कसरत असते. अशा वेळी या रस्त्यावर वन-वेची अंमलबजावणी होणे आवश्यक असताना त्याबाबत मात्र वाहतूक शाखेने तसेच पालिकेनेही दुर्लक्ष केले आहे.

सम-विषम पार्किंगदेखील बारगळली...

n जुनी पालिका चौक ते नेहरू चौक, तसेच पालिका चौक ते दीनदयाल चौक या दरम्यानच्या रस्त्यावर सम-विषम पार्किंग करण्याचा निर्णय वेळोवेळी घेण्यात आला आहे. नवीन अधिकारी आल्यावर त्याची तेवढ्यापुरती अंमलबजावणी केली जाते. नंतर पुन्हा ते बारगळते. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर दुकाने आहेत. शाळा, बँका, दवाखाने व इतर कार्यालये तसेच बाजाराचा परिसर असल्यामुळे वाहनधारक रस्त्याच्या दोन्ही बाजुला मोठ्या प्रमाणावर आपली वाहने लावत असतात. त्यामुळे रहदारीला अडथळा येत असतो. दोन महिन्यांपूर्वी सम-विषम पार्किंगची अंमलबजावणी सुरू झाली, परंतु आता पुन्हा ती बारगळली आहे.

Web Title: One-way boards on four roads, but no implementation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.