४८ गावे ११ पाड्यांमधील एक लाख ग्रामस्थ तहाणले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 12:35 IST2020-05-04T12:35:29+5:302020-05-04T12:35:36+5:30

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : एकीकडे कोरोनाचा अटकाव करण्यासाठी प्रशासनाची धावपळ, दुसरीकडे लॉकडाऊनमुळे शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांच्या ...

One lakh villagers in 48 villages and 11 padas are thirsty | ४८ गावे ११ पाड्यांमधील एक लाख ग्रामस्थ तहाणले

४८ गावे ११ पाड्यांमधील एक लाख ग्रामस्थ तहाणले

मनोज शेलार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : एकीकडे कोरोनाचा अटकाव करण्यासाठी प्रशासनाची धावपळ, दुसरीकडे लॉकडाऊनमुळे शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर मर्यादा यामुळे पाणी टंचाईने होरपळणाºया गावांना कुणीही वाली नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील १ लाख दोन हजार ९१२ लोकसंख्येच्या ४८ गावे व ११ पाड्यांमध्ये तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पर्यायी उपाययोजना नसल्याने पाणी टंचाईने होरपळणाºया नागरिकांना जंगलात, दºयाखोºयात पायपीट करावी लागत आहे.
जिल्ह्यात यंदा सरासरीचा १४२ टक्के पाऊस झाला आहे. सर्वच तालुक्यातील पावसाने सरासरी ओलांडली होती. त्यामुळे लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी ९५ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे यंदा पाणी टंचाईची तीव्रता राहणार नाही असे वाटत असतांना ४८ गावे व ११ पाड्यांमध्ये सर्व्हेक्षणाअंती टंचाईच्या झळा बसण्याचे स्पष्ट झाले. आता मे महिना सुरू झाला तरी या गावांना टंचाईच्या उपाययोजना केल्या गेल्या नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
शेवटचा टप्पा खडतर
फेब्रुवारीपर्यंत टंचाईग्रस्त गावांना पाण्याची फारशी समस्या भेडसावली नाही. शेवटचा टप्पा अर्थात मार्च ते मे दरम्यान तीव्र टंचाईची शक्यता गृहीत धरून मार्च महिन्यात उपाययोजनांना गती देण्यात येणार होती. परंतु मार्चच्या दुसºया आठवड्यापासून कोरोनाची तीव्रता वाढली. तिसºया आठवड्यात अर्थात २३ मार्च पासून लॉकडाऊन सुरू झाले. परिणामी या गावांना पर्यायी उपाययोजना होऊच शकल्या नाहीत. कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची कमरता, कामासाठी मजुरांची टंचाई, वाहने न मिळणे यासह इतर समस्यांमुळे उपाययोजना होऊच शकल्या नाहीत. परिणामी या गावांना आता भर उन्हाळ्यात तीव्र टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
सर्वाधिक नंदुरबार तालुका
टंचाईच्या झळा असलेल्या सर्वाधिक २४ गावे ही नंदुरबार तालुक्यातील आहेत. त्या खालोखाल १२ गावे शहादा तालुक्यातील असून नवापुर तालुक्यात सहा गावे व नऊ पाडे, अक्कलकुवा तालुक्यात ४ गावे तर धडगाव तालुक्यात दोन गावे व दोन पाड्यांचा समावेश आहे. भूजल विभागाच्या सर्व्हेनुसार ही गावे असले तरी सद्य स्थितीत यापेक्षा दुप्पट गावे व पाड्यांवर टंचाईचा सामना करावा लागत आहे.
कुपनलिकांवर हातपंपच नाहीत
गेल्या वर्षी टंचाईच्या काळात सातपुड्यातील धडगाव, अक्कलकुवा व तळोदा तालुक्यातील अनेक गाव, पाडयांमध्ये कुपनलिका करण्यात आल्या. त्यांना पाणीही बºयापैकी लागले, परंतु अशा ठिकाणी हातपंपच बसविण्यात आले नसल्याने त्या कुपनलिका नुसत्याच शोभेच्या वस्तू बनून आहेत. हातपंप बसविले गेले असते तर आज संबधीत गाव, पाड्यातील लोकांना स्थानिक ठिकाणीच पाणी उपलब्ध झाले असते.
आता तरी गती द्यावी
सध्या लॉकडाऊन शिथील करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी रोहयोची कामे सुरू झाली आहेत. शासकीय वाहनांना सुट देण्यात येत आहे. त्यामुळे आता पाणी टंचाई उपाययोजनांच्या कामांना गती द्यावी अशी मागणी होत आहे. कागदपत्र रंगविण्याऐवजी थेट निर्णय घेवून कामांचे कार्यादेश द्यावे अशी मागणी देखील करण्यात आली आहे.

४नंदुरबार तालुक्यातील ५७,३२७ लोकसंख्येच्या २४ गावांमध्ये टंचाई आहे. उपाययोजनांमध्ये सर्वच २४ ठिकाणी विहिर अधिग्रहण प्रस्तावीत आहे.
४नवापूर तालुक्यातील१२,०१२ लोकख्येंच्या १५ ग्रामपंचायतीची सहा गावे व ९ पाड्यांमध्ये ९ ठिकाणी विहिर अधीग्रहण तर ६ ठिकाणी विंधन विहिर घेण्यात येणार होत्या.
शहादा तालुक्यातील २९,०२३ लोकसंख्येच्या १२ गावांमध्ये कुपनलिका खोदण्यात येणार होत्या.
अक्लककुवा तालुक्यातील ३,४२४ लोकसंख्येच्या ४ गावांमध्ये चारही ठिकाणी विंधन विहिर खोदण्यात येणार होत्या.
धडगाव तालुक्यात १,१२६ लोकसंख्येच्या दोन गावे व दोन पाड्यांमध्ये दोन ठिकाणी विहिर अधिग्रहण तर दोन ठिकाणी टँकर प्रस्तावीत होते.

जिल्ह्यात सरासरीचा तब्बल ४२ टक्के अधीक पाऊस झाला असल्यामुळे यंदा जिल्हा टँकरमुक्त राहील असा अंदाज होता. परंतु धडगाव तालुक्यातील गौºयाचा बोदलापडा येथे यंदाही टँकर लागणार आहे.
या गावाला एप्रिल महिन्यापासूनच टँकर प्रस्तावीत केले गेले गेल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे टँकरमुक्तीचे स्वप्नच राहिले. दरवर्षी केवळ याच ठिकाणी टँकर सुरू राहते.

Web Title: One lakh villagers in 48 villages and 11 padas are thirsty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.