‘ओखी’च्या तडाख्याने नंदुरबारमध्ये रब्बी पिकांवर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 01:06 PM2017-12-06T13:06:25+5:302017-12-06T13:10:49+5:30

जिल्ह्यातील विविध भागात पाऊस झाल्याने कापूस व हरभरा ओला

'Oki' water at rabi crops in Nandurbar | ‘ओखी’च्या तडाख्याने नंदुरबारमध्ये रब्बी पिकांवर पाणी

‘ओखी’च्या तडाख्याने नंदुरबारमध्ये रब्बी पिकांवर पाणी

Next
ठळक मुद्देअक्कलकुवा, धडगाव, तळोदा, नवापूर, नंदुरबार, शहादा शहरांसह ग्रामीण भागात तुरळक पाऊसग्रामीण भागातील शेतशिवारात शेतकरी आणि मजूरांची धावपळदिवसभर पावसाची रिपरिप आणि ढगाळ वातावरण

आॅनलाईन लोकमत
नंदुरबार,दि.६ : ओखी वादळाचा परिणाम जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून जाणवण्यास सुरूवात झाली़ यामुळे जिल्ह्यातील विविध भागात संततधार पाऊस होऊन शेतशिवार जलमय झाले़ पावसामुळे पेरणी झालेला गहू, फुलावर आलेला हरभरा आणि बोंडाबाहेर आलेला कापूस यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे़
आज सकाळी अक्कलकुवा, धडगाव, तळोदा, नवापूर, नंदुरबार, शहादा शहरांसह ग्रामीण भागात तुरळक पावसाचे थेंब कोसळत होते़ मंगळवारी सकाळी ९ नंतर पावसाच्या मध्यम सरी बरसण्यास सुरूवात झाल्याने नागरिकांची शहरी भागात नागरिकांची तर ग्रामीण भागातील शेतशिवारात शेतकरी आणि मजूरांची धावपळ उडाली़ हिवाळ्यात कोसळणाºया अतीशित सरींमुळे अनेकांना हुडहुडी भरली होती़ ओखी वादळामुळे जिल्ह्यात आगामी ३६ तास पावसाची स्थिती कायम राहणार आहे़

शहादा शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी मंगळवारी अवकाळी पाऊस बरसल्याने वातावरणात गारठा निर्माण झाला. शहरात सकाळी अवकाळी पावसाची सुरुवात झाली. पाठोपाठ तालुक्यातील सारंगखेडा, ब्राह्मणपुरी येथे पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे शेतकरी, व्यापारी सर्वांचीच अडचण झाली. शहरात दुपारी १२ वा. सुमारास पावसाने चांगलाच जोर धरला सुमारे तासभर पाऊस झाला. तालुक्यात झालेल्या पावसामुळे वातावरणात गारठा निर्माण झाला़ सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने नागरिकांना आज सूर्यदर्शन झाले नाही. दिवसभर पावसाची रिपरिप आणि ढगाळ वातावरण होते़
नंदुरबार शहर व तालुक्यातही सकाळपासून पाऊस झाला़ सकाळी आठ वाजेपासून सुरू झालेल्या पावसामुळे नंदुरबार शहरात नागरिकांची धावपळ उडाली होती़ मंगळवार असल्याने आठवडे बाजारासाठी आलेल्या भाजी विक्रेत्या महिला आणि ग्रामीण भागातील नागरिकांना पावसातच खरेदी न करताच परत गेले होते़ यामुळे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे़
नवापूर शहर आणि तालुक्यात पहाटेपासूनच पावसाची रिपरिप सुरु झाली. ती दिवसभर कायम राहिली. दुपारी तीन नंतर पावसाचा जोर वाढला होता़ मधून मधून ढगांचा गरजण्याचा आवाजही झाला. शेतांमधे काढुन ठेवलेला भुईमूग व भाताचा चारा या पावसात भिजल्याने पशुपालक व शेतकºयांचे नुकसान झाले.

Web Title: 'Oki' water at rabi crops in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.