समाज माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्यास गुन्हे दाखल होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 12:06 IST2020-04-06T12:06:22+5:302020-04-06T12:06:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जगभरासह देशात कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे़ यातून देश आणि राज्यात लॉकडाऊन करण्यात आले ...

समाज माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्यास गुन्हे दाखल होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जगभरासह देशात कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे़ यातून देश आणि राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे़ याचा फायदा घेत काहींकडून चुकीच्या पोस्ट सोशल मिडियातून फॉरवर्ड करुन गैरसमज पसरवणे तसेच धार्मिक तेढ निर्माण केली जात आहे़ या पार्श्वभूमीवर पोलीस दल सतर्क झाले असून सोशल मिडीयावर नजर ठेवत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार आहेत़
पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी कोरोनाच्या आडून दोन धर्मात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाईचे संकेत दिले असून त्यानुसार सायबर सेल सोशल मिडियावर लक्ष ठेवणार आहे़ लॉक डाऊन काळात विशिष्ट धर्माबद्दल जुने व्हिडिओ पोस्ट करणे, मेसेज, आॅडिओ क्लिप, प्रसारित करुन अफवा पसरवणे तसेच कोरोनाबद्दलचे जुने व्हिडिओ पोस्ट करुन नागरिकांत भिती निर्माण करण्याचे प्रकार सुरु आहेत़ यात गेल्या आठ दिवसात दोन पोलीस ठाण्यांमध्ये कायदेशीर कारवाई करुन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ यातूनही हे प्रकार बंद होत नसल्याने समाज माध्यमात प्रचलित असलेल्या त्या त्या व्हॉटसअप ग्रुपने १५ एप्रिलपर्यंत फक्त ग्रुप अॅडमिनने मेसेज करण्याची सेटींग करुन कामकाज करण्याचे कळवले आहे़
पोलीस दलाच्या सायबर सेलकडून सर्वच प्रकारच्या सोशल मिडियावर लक्ष ठेवले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ यातून नियंमांचे उल्लंघन झाल्याने फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ पोलीस दलाकडून सर्व पोलीस ठाण्यांना याबाबत सूचना करण्यात आल्या असून दर दिवशी सोशल मिडियात प्रसारित होणाºया सर्व पोस्टचा आढावाही घेतला जाणार आहे़
दरम्यान या पार्श्वभूमीवर पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी शनिवारी रात्री जिल्ह्यातील मौलवींची बैठक घेत त्यांना विविध सूचना केल्या होत्या़ यावेळी त्यांनी कोरोना दूर ठेवण्यासाठी सामूहिक नमाज पठण आणि इतर सार्वजनिक कार्यक्रम टाळण्याच्या सूचना केल्या आहेत़ त्यांच्या सर्व सूचना मौलवींकडून मान्य करण्यात आल्या असून त्यानुसार नमाज पठण हे घरोघरी करण्याचे सूचित केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे़