अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा ताबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 12:18 IST2019-12-21T12:18:18+5:302019-12-21T12:18:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील बसस्थानकालगत डोंगरगाव रोड, दोंडाईचा रोड, खेतिया रोड परिसरातील वाहतुकीला अडथळा ठरणाºया टपऱ्यांसह पक्के ...

अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा ताबा
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरातील बसस्थानकालगत डोंगरगाव रोड, दोंडाईचा रोड, खेतिया रोड परिसरातील वाहतुकीला अडथळा ठरणाºया टपऱ्यांसह पक्के व इतर अतिक्रमण पालिकेतर्फे काढण्यात आले. मात्र त्याठिकाणी आता अवैध प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांंनी ताबा घेतल्याने पालिकेने या अवैध प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांसाठी जागा मोकळी केली का? असा संतप्त प्रश्न उपस्थित होत आहे.
पालिकेतर्फे शहरात अतिक्रमण मोहीम सुरू असून बसस्थानकालगत, डोंगरगाव रोड व दोंडाईचा रोड आदी परिसरातील वाहतुकीला अडथळा निर्माण करणाºया अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यामुळे या परिसरातील अतिक्रमणधारकांनी कारवाई होण्याआधीच स्वत:हून अतिक्रमण काढून घेतले. तर काही अतिक्रमणावर बुलडोझर चालविण्यात आला. अतिक्रमण काढल्यामुळे डोंगरगाव रस्ता व बसस्थानक चौकाने मोकळा श्वास घेतला होता. मात्र या जागेवर सध्या अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांनी अतिक्रमण करीत वाहनांच्या रांगा लागत आहेत. या रस्त्यावर वाहने उभी राहत असल्याने बºयाचवेळा वाहतुकीची कोंडी होते. बसस्थानक ते पटेल रेसिडेन्सी चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा ही वाहने लावलेली असतात. हा रस्ता नवीन वसाहतींना जोडणारा मुख्य रस्ता असल्याने दिवसभर वाहनांची वर्दळ असते. आधीच अरुंद व त्यातच रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी राहत असल्याने बºयाचवेळा अपघात होतात.
या अवैध प्रवासी वाहतूक करणाºया वाहनधारकांना खाकीचा धाक नसल्याचे जाणवते. वाटेल त्याठिकाणी रस्त्यावर वाहने उभी केली जातात. काही वाहतूक पोलीस तर अटकाव करण्याचे सोडून त्या वाहनचालकांजवळ गप्पा करत उभे असतात. काही महिन्यापूर्वी शहराच्या वाहतुकीच्या नियंत्रणासाठी स्वतंत्र वाहतूक विभाग कार्यान्वित करण्यात आला. मात्र विभाग थोड्याच दिवसात हा विभाग बंद पडल्याचे समजते. पालिका प्रशासनाने रस्त्यावरील लॉरी, टपºया, हातगाड्यांवर कारवाई करून रस्ते मोकळे केले. तर मुख्य रस्त्यांवर कोणताच धाक न बाळगता वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाºया वाहनांवर पोलीस प्रशासन कारवाई का करीत नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अतिक्रमण काढून मोकळ्या झालेल्या जागेवर पालिका व पोलिसांनी योग्य त्या उपाययोजना करून वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहने हटविण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.