रात्रीची संचारबंदी किंवा शाळा बंद करण्याचा विचार नाही, नंदुरबार, शहादा व तळोद्यात लग्न समारंभ आयोजकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:48 IST2021-02-23T04:48:45+5:302021-02-23T04:48:45+5:30
नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना वाढू नये यासाठी विविध पातळीवर उपाययोजना सुरू आहेत. अर्थात रुग्ण संख्या पूर्वीपेक्षा थोडी कमी झाली ...

रात्रीची संचारबंदी किंवा शाळा बंद करण्याचा विचार नाही, नंदुरबार, शहादा व तळोद्यात लग्न समारंभ आयोजकांवर कारवाई
नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना वाढू नये यासाठी विविध पातळीवर उपाययोजना सुरू आहेत. अर्थात रुग्ण संख्या पूर्वीपेक्षा थोडी कमी झाली आहे. त्यामुळे रात्रीची संचारबंदी किंवा शाळा बंद करण्याचा कुठलाही विचार नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, नंदुरबार, शहादा व तळोदा येथे लग्न समारंभात ५० पेक्षा अधीक जणांची उपस्थिती राहिल्याने आयोजकांवर कारवाई करण्यात आली.
जिल्ह्यात कोरोनासंदर्भात लावण्यात आलेले निर्बंध व नियमांची कडक अंमलबजावणी केली जात आहे. त्याच अंतर्गत रविवारी नंदुरबारात तीन आयोजकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात बबन तुमडू अहिरे रा.संत रोहिदास शिरोमणी रोहिदास चौक, बाहेरपुरा नंदुरबार यांनी बाहेरपुरा या ठिकाणी, जयेश सुदाम कुवर, रा. रनाळे, ता.नंदुरबार यांनी छत्रपती शिवाजी नाट्य मंदीर या ठिकाणी, शिरीष ताराचंद वारूळे, रा. विरसावकर नगर यांनी विर सावरकर नगर येथे राहत्या घरी यांचा समावेश आहे.
तळोदा येथे पालिकेच्या मालकीच्या भवनात आयोजित लग्न समारंभाचे आयोजक वधू पालक रवींद्र बाबुराव पाटील, रा.चिनोदा व वर पालक दिनेश सुभाष चव्हाण रा.तळोदा यांच्याकडून प्रत्येकी १० हजार असे एकूण २० हजारांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर शहादा येथे लेवा पाटीदार समाज मंगल कार्यालयात १० हजार तर केशरानंद मंगल कार्यालयात १६ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला.