शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

नितीश कुमार कधीही एनडीएमध्ये येऊ शकतात, मोदी सरकारमधील मंत्र्याच्या दाव्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2023 17:25 IST

Nitish Kumar: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपाची साथ सोडल्यापासून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी मोदी आणि भाजपाविरोधात आघाडी उभी करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपाची साथ सोडल्यापासून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी मोदी आणि भाजपाविरोधात आघाडी उभी करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. मात्र नितीश कुमार हे कधीही एनडीएमध्ये येऊ शकतात, असा दावा करून मोदी सरकारमधील मंत्री रामदास आठवले यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. पाटणामध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रामदास आठवले यांनी सांगितले की, नितीश कुमार हे आणच्यासोबत राहिलेले आहेत. ते कधीही आमच्यासोबत येऊ शकतात. नितीश कुमार यांनी आधीही अशाप्रकारे मित्रपक्ष बदललेले आहेत.

बिहारच्या दौऱ्यावर असलेल्या रामदास आठवले यांना नितीश कुमार यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. नितीश कुमार यांनी पुन्हा एनडएमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली तर त्यांना सोबत घेतले जाईल का, असं विचारलं असता आठवले म्हणाले की, नितीश कुमार हे आधीही आमच्यासोबत राहिलेले आहेत. तसेच ते कधीही आमच्यासोबत येऊ शकतात. नितीश कुमार यांनी विरोधी आघाडीच्या मुंबईत होणाऱ्या बैठकीला जाऊ नये, असे आवाहनही रामदास आठवले यांनी केले.

रामदास आठवले हे विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने बिहारच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी मुंगेरचा दौराही केला. तसेच बिहारमध्ये झालेल्या विकासकामांबाबत नितीश कुमार यांचं कौतुकही केलं. त्यांनी सांगितलं की बिहारमध्ये रस्त्यांसह इतर क्षेत्रामध्ये चांगलं काम केलं आहे. नितीश कुमार यांनी बिहारमध्ये केलेलं विकासकाम सहजपणे दृष्टीस पडतं. आधी बिहारमधील रस्ते चांगले नव्हते. मात्र आता नितीश कुमार यांच्या नेतृत्वात खूप चांगलं काम झालं आहे.  

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारRamdas Athawaleरामदास आठवले