नवापुरात मुख्यधिकारी कारवाई करताना दुजाभाव करत असल्याचा व्यापाऱ्यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:31 IST2021-05-13T04:31:05+5:302021-05-13T04:31:05+5:30

काही दुकानं सील केली जात आहे तर काही दुकानांकडे दुर्लक्ष केले जात आहे. दंडाची रक्कम देखील कमी-जास्त आकारण्यात येत ...

In Navapur, traders allege that the chief minister is causing harm while taking action | नवापुरात मुख्यधिकारी कारवाई करताना दुजाभाव करत असल्याचा व्यापाऱ्यांचा आरोप

नवापुरात मुख्यधिकारी कारवाई करताना दुजाभाव करत असल्याचा व्यापाऱ्यांचा आरोप

काही दुकानं सील केली जात आहे तर काही दुकानांकडे दुर्लक्ष केले जात आहे. दंडाची रक्कम देखील कमी-जास्त आकारण्यात येत आहे. काही बड्या व्यापाऱ्यांना दंडात झुकते माप दिले जात आहे तर छोट्या व्यापाऱ्यांकडून सरसकट दंड घेतला जात असल्याची तक्रार नवापूर मर्चेट सेवा असोसिएशनच्या व्यापाऱ्यांनी तहसीलदार मंदार कुलकर्णी यांच्याकडे केली आहे.

१५ मे संचारबंदीत वैधता पूर्ण होत आहे. नवापूर शहर आणि ग्रामीण भागात कोरोना रुग्ण वाढीवर अंकुश आला असून, परिस्थिती नियंत्रणात येत आहे. १६ मे पासून सर्व दुकानदारांना व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी. दुकानदार व्यावसायिकांना फ्रंटलाईन वाॅरियर्स म्हणून मान्यता देण्यात यावी आणि दुकानदार व दुकानातील कामगारांसाठी स्वतंत्र लसीकरण व्यवस्था करण्यात यावी. संचारबंदीत व्यापारी हवालदिल झाले असून, त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे प्रशासनाने वीजबिल पूर्ण माफ करावे, व्यापारी संकुलाचे भाडे माफ करावे. दुकानदारांवर कारवाई करण्यापेक्षा बाजारात विना मास्क होणाऱ्या गर्दीवर कारवाई करावी. तसेच अक्षयतृतीया व रमजान ईद येत असल्याने ग्राहकांची खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. गर्दी कमी करण्यासाठी व्यापाऱ्यांना वाढीव वेळ देण्यात यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात आली.

नवापूर शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी कोरोना रॅपिड टेस्टिंग करून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे ग्राहकाला संसर्ग होणार नाही व आपल्याला झालेल्या संसर्गाचे निदान होईल. कोरोनाला नियंत्रित ठेवण्यासाठी व्यापाऱ्याने लक्ष देणे गरजेचे आहे. तोंडाला मास्क, फिजिकल नंतर सॅनिटाईझरचा वापर करणे गरजेचे आहे. -मंदार कुलकर्णी, तहसीलदार नवापूर

नवापूर नगरपालिकेचे मुख्यधिकारी संचारबंदीत कारवाई करताना दुजाभाव करत असल्याचे दिसून येत आहे. मोठ्या व्यापाऱ्यांचा दंड कमी केला जात आहे तर साधारण व्यापाऱ्यांकडून सरसकट दंड केला जात आहे हे चुकीचे आहे. मुख्याधिकाऱ्यांनी सर्वांना समान न्याय देणे गरजेचे आहे अन्यथा व्यापारी संघटना आंदोलन करेल. - राजेश अग्रवाल, अध्यक्ष, नवापूर मर्चेट सेवा असोसिएशन

Web Title: In Navapur, traders allege that the chief minister is causing harm while taking action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.