राष्ट्रीयकृत बँका पाच टक्क्यावरच थांबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 12:24 IST2020-06-11T12:24:02+5:302020-06-11T12:24:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कर्जमाफीच्या प्रतिक्षेत असलेल्या राष्ट्रीयकृत बँकांचे कर्जवितरण सोमवारपासून केवळ पाच टक्क्यांवर अडले आहे़ राष्ट्रीयकृत, ग्रामीण ...

Nationalized banks stood at five per cent | राष्ट्रीयकृत बँका पाच टक्क्यावरच थांबल्या

राष्ट्रीयकृत बँका पाच टक्क्यावरच थांबल्या

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कर्जमाफीच्या प्रतिक्षेत असलेल्या राष्ट्रीयकृत बँकांचे कर्जवितरण सोमवारपासून केवळ पाच टक्क्यांवर अडले आहे़ राष्ट्रीयकृत, ग्रामीण आणि खाजगी बँकांनी मिळून हे पाच टक्के कर्ज शेतकऱ्यांना वाटप केले आहे़ या कर्जवाटपाला गतीच येत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत़
जिल्ह्यातील ११ राष्ट्रीयकृत बँकाच्या किमान ६० शाखांमधून ५७१ कोटी ६२ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दीष्ट्य ठेवण्यात आले आहे़ ग्रामीण बँकांकडून किमान १६ कोटी ६४ लाख तर खाजगी बँकांनी १० कोटी ५७ लाख रुपयांच पीक कर्ज वाटप करण्याचे निर्धारित आहे़ परंतू आजअखेरीस या सर्व बँकांनी मिळून १ हजार ८९५ शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप केले आहे़ यात खाजगी बँकांनी सर्वाधिक वाटा उचलला असून त्यांनी १२ टक्के शेतकºयांपर्यंत कर्ज पोहोचते केले आहे़ ग्रामीण बँकांची स्थिती अद्यापही चांगली नसल्याचे तर राष्ट्रीयकृत बँका पूर्णपणे ढेपाळल्या असल्याचे समोर आले आहे़
या सर्व प्रकाराला कर्जमुक्ती योजना कारणीभूत असल्याचे सांगून बँका अंग झाडत असल्या तरीही दरवर्षी राष्ट्रीयकृत बँका पीक कर्ज वाटपाबाबत शेतकºयांना फिरवाफिरव करण्याची जुनी पद्धत आहे़ मागील वर्षाचा बोजा कमी करणे, कागदपत्रे अपडेशन यातच वेळ घालवण्यात येत आहे़ बँकांना अद्यापही रिझर्व्ह बँकेचे शेतकºयांना सरसकट कर्ज वाटपाच्या सूचना आलेल्या नसल्याने प्रशासनाने बँकांसोबत बैठक घेऊन कर्ज वाटपाचा मार्ग मोकळा करण्याची मागणी होत आहे़

राष्ट्रीयकृत बॅकांमधून १ हजार ५६६ शेतकºयांना २२ कोटी ३२ लाख रुपये, ग्रामीण बँकेतून केवळ ८१ शेतकºयांना ८ लाख ८ हजार तर खाजगी बँकांनी २४८ शेतकºयांना ९९ लाख ८० हजार रुपयांचे कर्ज वाटप केल्याची समोर आली आहे़ खाजगी बॅकांचे नियम आणि अटी शर्ती ह्या वेगळ्या असल्याने त्यांच्याकडून कर्जाची पूर्तता तातडीने होत असल्याने त्यांच्याकडून वर्षाला ५० टक्क्यांपेक्षा अधिक शेतकºयांना कर्ज देण्यात येते़ परंतू राष्ट्रीयकृत बँका निर्धारित उद्दीष्टापासून मागेच रहात असल्याने शेतकºयांना सावकारी कर्ज घ्यावे लागते़

Web Title: Nationalized banks stood at five per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.