पीक कर्जवाटपात आतापासूनच राष्ट्रीयीकृत बँकांनी टाकली नांगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:31 IST2021-05-12T04:31:18+5:302021-05-12T04:31:18+5:30
जिल्ह्यात गेल्या वर्षात जिल्हा प्रशासनाने केलेल्या सूचनांच्या बळावर सर्व बँका मिळून २२८ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले होते. ...

पीक कर्जवाटपात आतापासूनच राष्ट्रीयीकृत बँकांनी टाकली नांगी
जिल्ह्यात गेल्या वर्षात जिल्हा प्रशासनाने केलेल्या सूचनांच्या बळावर सर्व बँका मिळून २२८ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले होते. यातून यंदा ५०० कोटी रुपयांचे कर्ज वाटप करून शेतकऱ्यांना कोरोना काळात वाढीव मदत देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे; परंतु जिल्हा प्रशासनाच्या या उद्देशाला राष्ट्रीयीकृत बँका सुरुंग लावत असून त्यांच्या संथ कारभारामुळे शेतकरी त्रस्त आहेत. वास्ताविक जिल्ह्यात २७ हजार शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले कृषी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळाला आहे. यातून १८ कोटी रुपयांचे कर्ज माफ झाले आहे. याचा लाभ उठवत जिल्हा बँकेने कर्जमुक्त शेतकऱ्यांना कर्ज वाटपाचा सपाटा लावला आहे, तर राष्ट्रीयीकृत, ग्रामीण आणि खासगी बँका सुस्त आहेत.
याबाबत जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक जयंत देशपांडे यांना संपर्क केला असता, तो होऊ शकला नाही.