शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नर्मदेचे आरक्षीत पाणी नंदुरबार जिल्ह्यालाच मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 13:13 IST

सातपुडय़ाचा गाळप हंगामाचा शुभारंभ : जलसंपदा मंत्री व पालकमंत्र्यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : सुरू असलेले कारखाने बंद पाडून ते विकत घेण्याचा धंदा गेल्या काळात काहींनी केला. सहकार चळवळ मोडीत काढण्यात आला, परंतु अडचणीतून मार्ग काढत सातपुडा सक्षमपणे सुरू आहे. त्याचे कौतूक करीत नर्मदेचे आरक्षीत पाणी जिल्ह्यालाच मिळेल ते कुठेही वळविले नसल्याची ग्वाही जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सातपुडा साखर कारखाना गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी बोलतांना दिली.सातपुडा साखर कारखान्याचा 43 वा गळीत हंगामाचा शुभारंभ जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते शनिवारी झाला. कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, उद्योगपती सरकार रावल, अपर जिल्हाधिकारी अनिल पाटील, पोलीस अधीक्षक संजय पाटील, माजी आमदार रामकृष्ण पाटील, जि.प.चे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, शिंदखेडा बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, शहादा बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन राजाराम पाटील, कारखान्याचे व्हा.चेअरमन प्रेमसिंग अहेर, दूध संघाचे चेअरमन रवींद्र राऊळ उपस्थित होते.स्व.पी.के. अण्णांच्या कार्याचा गौरव करून गिरीश महाजन म्हणाले की, कारखानदारी मोडीत काढणे सोपे असते मात्र टिकविणे कठीण असते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत पी.के. अण्णांनी सहकाराच्या माध्यमातून कारखाना उभा केला. कारखान्याच्या माध्यमातून इतर सहकारी प्रकल्प उभारून शेतकरी हिताचे मोठे काम उभे केले. राज्य सरकार हे शेतक:यांच्या हिताचे काम करीत आहे. सातपुडा कारखान्याच्या बंद पडलेल्या 22 उपसा सिंचन योजनांची कामे येत्या 15 दिवसात सुरू होतील आणि नर्मदा खो:यातील आरक्षित संपूर्ण 5.5 टीएमसी पाणी नंदुरबार जिल्ह्यालाच मिळेल, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली. तापी-बुराई, सुलवाडा-जामखेल आदी खान्देशातील सर्व प्रकल्प येत्या 10 वर्षात पूर्ण होऊन खान्देशचा कायापालट पूर्ण करणार असल्याचे महाजन यांनी सांगितले. शासन नेहमी शेतक:यांच्या पाठीशी असून शेतक:यांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची आणि येत्या 10 वर्षात खान्देशचा कायापालट करण्याची ग्वाही त्यांनी दिली. नर्मदा खो:यातील आरक्षित पाणी नंदुरबार जिल्ह्यालाच मिळेल, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनीही पी.के. अण्णा पाटील यांचे कार्य इतरांना प्रेरणास्त्रोत असल्याचे सांगून पी.के. अण्णांशी आपल्या परिवाराचे तीन पिढय़ांचे संबंध आहेत. अण्णांनी शहादा परिसरात सहकाराचे जाळे विणून शेतकरी उभा केला, आदर्श संस्था निर्माण केल्याचे सांगितले. राजकारणात मतभेद असतात मात्र विकासात सर्वानी एकत्र येणे आवश्यक असल्याने आपण सातपुडा साखर कारखान्याचे आमंत्रण स्वीकारले. कारखान्याच्या माध्यमातून शेतक:यांचा विकास साधला जातो, परिसराचा आर्थिक विकास होतो, राज्याला महसूल मिळतो म्हणून कारखानदारी जीवंत राहिली पाहिजे. तालुक्याच्या विकासासाठी सातपुडा चालला पाहिज असेही रावल यांनी सांगितले.कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील म्हणाले की, शासनाची कोणतीही मदत न घेता परिसरातील व्यापारी, पतसंस्था, शेतकरी यांच्या आर्थिक सहयोगातून कारखाना सुरू आहे. विविध कारणांनी मधल्या काही काळात कारखाना बंद पडला. मात्र नंतर सभासद, शेतकरी, अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकार्याने कारखाना पुन्हा सुरू झाला. शेतक:यांनी इतर कारखान्याच्या कोणत्याही अमिशाला बळी न पडता कारखान्यास ऊस पुरविण्याचे आवाहन दीपक पाटील यांनी केले. विजय चौधरी यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक कार्यकारी संचालक पी.आर. पाटील यांनी तर सूत्रसंचालन के.डी. पाटील यांनी केले. कार्यक्रमास हैदरअली नुरानी, विजय विठ्ठल पाटील, उपनगराध्यक्षा रेखाबाई चौधरी, सरपंच ज्योती पाटील, माधव पाटील आदी उपस्थित होते.