शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
4
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
5
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
6
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
7
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
8
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
9
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
10
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
11
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
12
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
13
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
14
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
15
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
16
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
17
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
18
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
19
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
20
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."

नंदुरबार पालिकेत सत्ताधारी व विरोधकांचे देर आये, दुरूस्त आयेची गत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 12:09 IST

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  पालिका निवडणुकीनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमधील सुंदोपोसुंदी गेल्या महिन्यात हातघाईवर आली होती. त्यातून निर्माण झालेला राडा संपुर्ण जिल्ह्याने पाहिला. त्यामुळे पालिकेची पुढची सर्वसाधारण सभा कशी होते याकडे सर्वाचे लक्ष लागून होते. परंतु दोन्ही गटाचे हात पोळल्याने व देर आये दुरूस्त आये या म्हणीप्रमाणे दोन्ही गटाने ...

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  पालिका निवडणुकीनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमधील सुंदोपोसुंदी गेल्या महिन्यात हातघाईवर आली होती. त्यातून निर्माण झालेला राडा संपुर्ण जिल्ह्याने पाहिला. त्यामुळे पालिकेची पुढची सर्वसाधारण सभा कशी होते याकडे सर्वाचे लक्ष लागून होते. परंतु दोन्ही गटाचे हात पोळल्याने व देर आये दुरूस्त आये या म्हणीप्रमाणे दोन्ही गटाने सामंजस्याने घेवून गुरुवारची सर्वसाधारण सभा पार पाडली. या सभेत आरोप-प्रत्यारोप झाले, काही विषयांवर गोंधळही झाला. परंतु तो लोकशाही मार्गाने. तेच शहरवासीयांसह सर्वाना अभिप्रेत असून विकासाला ते प्रेरकच असते. यापुढे देखील सत्ताधारी व विरोधकांचे असेच वागणे शहरवासीयांना अभिप्रेत आहे.पालिका निवडणुकीत सत्ताधारी व विरोधकांमध्ये झालेले सार्वजनिक, वैयक्तिक व कौटूंबिक आरोप-प्रत्यारोपामुळे मोठय़ा प्रमाणावर कटूता निर्माण झाली होती. दोन्ही गट एकमेकांवर आरोप करण्याची, एकमेकांना पाण्यात पाहण्याची एकही संधी सोडत नव्हते. त्याचे प्रतिबिंब पालिकांच्या सर्वसाधारण सभांमध्ये देखील उमटत होते. गेल्या महिन्यात अर्थात 3 एप्रिल रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेतील राडा सर्वानाच माहिती आहे. सभागृहातील हा राडा थेट रस्त्यावर येवून त्यातून शहरवासीयांना वेठीस धरण्यात आले होते. दोन्ही गटाच्या नगरसेवकांसह कार्यकत्र्याना आरोपी करण्यात आले होते. त्यामुळे गुरुवार, 3 मेच्या सभेकडे सर्वाचे लक्ष होते. आधीच नगराध्यक्षांनी पोलीस विभागाला पत्र देवून पोलीस बंदोबस्ताची मागणी केली होती. विरोधी गटाने देखील तशीच मागणी केली होती. त्यामुळे ज्या ठिकाणी सभा होती त्या नाटय़गृह परिसराला छावनीचे स्वरूप आले होते. सभेच्या अजेंडय़ावर केवळ पाच विषय होते. त्या विषयांवर चर्चा झाली. काही विषयांवर आरोप-प्रत्यारोप झाला. नगराध्यक्षा र}ा रघुवंशी यांनी यावेळी नेहमीच्या भुमिकेला आणि स्वभावाला फाटा देवून आणि थोडी कणखर आणि प्रसंगी समतोल भुमिका घेवून सभा चालवून नेली. विरोधी गटाचे प्रतोद चारूदत्त कळवणकर यांनी देखील नियमाप्रमाणेच मुद्दयांना हात घातला. इतर विरोधी सदस्यांनीही आक्रमकपणे भुमिका मांडण्याचा प्रय} केला. त्यांचेही म्हणने नगराध्यक्षांनी ऐकुण घेत समाधानकारक उत्तरे दिली. नेहमीप्रमाणे अध्यक्षांच्या डायसजवळ येवून आक्रमकपणे आपली भुमिका मांडण्याचा प्रय} यावेळी झाला नाही. त्यामुळे दोन्ही गटांची सामंजस्याची आणि समजदारीची भुमिका दिसून आली. पत्रकारांना देखील सभागृहात परवाणगी नाकारण्यात आली होती. पीठासीन अधिका:यांना अर्थात नगराध्यक्षांना असलेल्या अधिकारात घेतलेल्या या निर्णयाला विरोधी गटाचे कळवणकर यांनी आक्षेप घेतला परंतु त्यांनीही जास्त हा मुद्दा लावून धरला नाही.शहर विकासाचा अजेंडा राबवितांना सत्ताधारी गटाला विरोधकांच्या भुमिकेचा, त्यांच्या सुचनांचा आदर करावाच लागणार आहे. गेल्या पाच वर्षात एकतर्फी बहुमत असल्यामुळे पालिकेचे कामकाज एकतर्फीच चालवून घेता आले. परंतु आता विरोधकांची संख्या देखील दोन आकडी असल्यामुळे त्यांनाही सोबत घेवून काम करावे लागणार आहे. सत्ताधारी गटातील काही आक्रमक स्वभावाच्या नगरसेवकांनाही आपला स्वभाव बाजुला ठेवावा लागणार आहे. विरोधी गटातील काही नगरसेवकांनाही केवळ आरोप करायचा म्हणून करायचा ही सवय सोडावी लागणार आहे. जेथे पालिका चुकेल, निर्णय चुकतील, नागरिकांच्या हिताचे ते राहणार नाहीत, एकतर्फी कारभाराचे ते नमुने असतील तर त्या ठिकाणी जरूर आक्रमकपणे आपला निषेध नोंदवावा. परंतु जेथे विकासाचा मुद्दा येईल, सार्वजनिक व नागरिकांचा हिताचा मुद्दा येईल तेथे सहकार्याची भावना ठेवणे अपेक्षीत राहणार आहे. एकुणच महिनाभरापूर्वी घडलेल्या घटनेचे कटू वातावरण आणि एकमेकांच्या मनातील द्वेशभावना गुरुवारच्या सभेने दूर झाली, यापुढे देखील असेच वातावरण राहून त्यातून शहर विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.