शहरं
Join us  
Trending Stories
1
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
2
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
3
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
4
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
5
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
6
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
7
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
8
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
9
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
10
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
11
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
12
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
13
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
14
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
16
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
17
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
18
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
19
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
20
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

नंदुरबार पालिकेत सत्ताधारी व विरोधकांचे देर आये, दुरूस्त आयेची गत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 12:09 IST

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  पालिका निवडणुकीनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमधील सुंदोपोसुंदी गेल्या महिन्यात हातघाईवर आली होती. त्यातून निर्माण झालेला राडा संपुर्ण जिल्ह्याने पाहिला. त्यामुळे पालिकेची पुढची सर्वसाधारण सभा कशी होते याकडे सर्वाचे लक्ष लागून होते. परंतु दोन्ही गटाचे हात पोळल्याने व देर आये दुरूस्त आये या म्हणीप्रमाणे दोन्ही गटाने ...

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  पालिका निवडणुकीनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमधील सुंदोपोसुंदी गेल्या महिन्यात हातघाईवर आली होती. त्यातून निर्माण झालेला राडा संपुर्ण जिल्ह्याने पाहिला. त्यामुळे पालिकेची पुढची सर्वसाधारण सभा कशी होते याकडे सर्वाचे लक्ष लागून होते. परंतु दोन्ही गटाचे हात पोळल्याने व देर आये दुरूस्त आये या म्हणीप्रमाणे दोन्ही गटाने सामंजस्याने घेवून गुरुवारची सर्वसाधारण सभा पार पाडली. या सभेत आरोप-प्रत्यारोप झाले, काही विषयांवर गोंधळही झाला. परंतु तो लोकशाही मार्गाने. तेच शहरवासीयांसह सर्वाना अभिप्रेत असून विकासाला ते प्रेरकच असते. यापुढे देखील सत्ताधारी व विरोधकांचे असेच वागणे शहरवासीयांना अभिप्रेत आहे.पालिका निवडणुकीत सत्ताधारी व विरोधकांमध्ये झालेले सार्वजनिक, वैयक्तिक व कौटूंबिक आरोप-प्रत्यारोपामुळे मोठय़ा प्रमाणावर कटूता निर्माण झाली होती. दोन्ही गट एकमेकांवर आरोप करण्याची, एकमेकांना पाण्यात पाहण्याची एकही संधी सोडत नव्हते. त्याचे प्रतिबिंब पालिकांच्या सर्वसाधारण सभांमध्ये देखील उमटत होते. गेल्या महिन्यात अर्थात 3 एप्रिल रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेतील राडा सर्वानाच माहिती आहे. सभागृहातील हा राडा थेट रस्त्यावर येवून त्यातून शहरवासीयांना वेठीस धरण्यात आले होते. दोन्ही गटाच्या नगरसेवकांसह कार्यकत्र्याना आरोपी करण्यात आले होते. त्यामुळे गुरुवार, 3 मेच्या सभेकडे सर्वाचे लक्ष होते. आधीच नगराध्यक्षांनी पोलीस विभागाला पत्र देवून पोलीस बंदोबस्ताची मागणी केली होती. विरोधी गटाने देखील तशीच मागणी केली होती. त्यामुळे ज्या ठिकाणी सभा होती त्या नाटय़गृह परिसराला छावनीचे स्वरूप आले होते. सभेच्या अजेंडय़ावर केवळ पाच विषय होते. त्या विषयांवर चर्चा झाली. काही विषयांवर आरोप-प्रत्यारोप झाला. नगराध्यक्षा र}ा रघुवंशी यांनी यावेळी नेहमीच्या भुमिकेला आणि स्वभावाला फाटा देवून आणि थोडी कणखर आणि प्रसंगी समतोल भुमिका घेवून सभा चालवून नेली. विरोधी गटाचे प्रतोद चारूदत्त कळवणकर यांनी देखील नियमाप्रमाणेच मुद्दयांना हात घातला. इतर विरोधी सदस्यांनीही आक्रमकपणे भुमिका मांडण्याचा प्रय} केला. त्यांचेही म्हणने नगराध्यक्षांनी ऐकुण घेत समाधानकारक उत्तरे दिली. नेहमीप्रमाणे अध्यक्षांच्या डायसजवळ येवून आक्रमकपणे आपली भुमिका मांडण्याचा प्रय} यावेळी झाला नाही. त्यामुळे दोन्ही गटांची सामंजस्याची आणि समजदारीची भुमिका दिसून आली. पत्रकारांना देखील सभागृहात परवाणगी नाकारण्यात आली होती. पीठासीन अधिका:यांना अर्थात नगराध्यक्षांना असलेल्या अधिकारात घेतलेल्या या निर्णयाला विरोधी गटाचे कळवणकर यांनी आक्षेप घेतला परंतु त्यांनीही जास्त हा मुद्दा लावून धरला नाही.शहर विकासाचा अजेंडा राबवितांना सत्ताधारी गटाला विरोधकांच्या भुमिकेचा, त्यांच्या सुचनांचा आदर करावाच लागणार आहे. गेल्या पाच वर्षात एकतर्फी बहुमत असल्यामुळे पालिकेचे कामकाज एकतर्फीच चालवून घेता आले. परंतु आता विरोधकांची संख्या देखील दोन आकडी असल्यामुळे त्यांनाही सोबत घेवून काम करावे लागणार आहे. सत्ताधारी गटातील काही आक्रमक स्वभावाच्या नगरसेवकांनाही आपला स्वभाव बाजुला ठेवावा लागणार आहे. विरोधी गटातील काही नगरसेवकांनाही केवळ आरोप करायचा म्हणून करायचा ही सवय सोडावी लागणार आहे. जेथे पालिका चुकेल, निर्णय चुकतील, नागरिकांच्या हिताचे ते राहणार नाहीत, एकतर्फी कारभाराचे ते नमुने असतील तर त्या ठिकाणी जरूर आक्रमकपणे आपला निषेध नोंदवावा. परंतु जेथे विकासाचा मुद्दा येईल, सार्वजनिक व नागरिकांचा हिताचा मुद्दा येईल तेथे सहकार्याची भावना ठेवणे अपेक्षीत राहणार आहे. एकुणच महिनाभरापूर्वी घडलेल्या घटनेचे कटू वातावरण आणि एकमेकांच्या मनातील द्वेशभावना गुरुवारच्या सभेने दूर झाली, यापुढे देखील असेच वातावरण राहून त्यातून शहर विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.