शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

नंदुरबार प्रशासनाच्या बोटचेपे धोरणामुळे उपद्रवींचे फावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 10:57 AM

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरासह जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यातील घटना, घडामोड पहाता उपद्रवी लोकं प्रशासन आणि पोलिसांच्या वरचढ ठरत आहेत. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देखील वारंवार उभा राहत आहे. सुदैवाने त्याची धग एक, दोन दिवसापुरती राहत असली तरी यामुळे मात्र सर्वसामान्य नागरिक वेठीस धरले जात आहेत. या ...

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरासह जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यातील घटना, घडामोड पहाता उपद्रवी लोकं प्रशासन आणि पोलिसांच्या वरचढ ठरत आहेत. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देखील वारंवार उभा राहत आहे. सुदैवाने त्याची धग एक, दोन दिवसापुरती राहत असली तरी यामुळे मात्र सर्वसामान्य नागरिक वेठीस धरले जात आहेत. या वारंवारच्या प्रकारांना जनता कंटाळली असून आता प्रशासन आणि पोलीस अर्थात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी कठोर होऊन निर्णय घेणे अपेक्षीत आहे.शहरासह जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यात एक अस्वस्थ वातावरण निर्माण झाल्याचे चित्र सर्वसामान्यांच्या मनात तयार होत आहे. त्याला कारण दर आठवडा, पंधरा दिवसात काही ना काही घटना घडतच आहेत. त्यामुळे दगडफेक, हाणामारी, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, बंद पुकारणे, कुणी ऐकले नाही तर त्याच्यावर चाल करून जाणे असे प्रकार होत आहेत.  यामुळे जनजिवनावर परिणाम होत आहे. वारंवारच्या बंदमुळे शहराची आर्थिक घडी देखील विस्कटत आहे.  कुणीही उठावे आणि बंदचे आवाहन करावे. त्यासाठी सोशल मिडियाचा अतीवापर करून जनतेत आणि व्यापा:यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण करावे व हे सर्व प्रशासनाने निमुटपणे पहावे, जसे काही त्याच्याशी आपले देणे-घेणे नाही.. असा सर्व प्रकार सध्या सुरू आहे. गेल्या साडेतीन महिन्यात नऊ वेळा कुठल्या ना कुठल्या कारणांनी बंद पुकारण्यात आला. त्यातील बहुतांश बंद तर आठवडे बाजाराच्या दिवशीच झाले आहेत. अक्षय्य तृतीयेसारख्या महत्त्वाच्या व खरेदीचा उत्साह असलेल्या सणाला बुधवारी बंद पाळावा लागला. यामुळे सराफा      बाजाराचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले. बंदमुळे हातावर पोट असणा:यांच्या नुकसानीचा तर अंदाजच नाही. बिचारे जेमतेम दिवसभर कमवून सायंकाळी आपल्या कुटूंबाला खाऊ घालतात अशांचे मोठे हाल होत आहे.या सर्व प्रकारांमुळे आता जनतेत प्रशासनाविषयीच चिड निर्माण झाली आहे. प्रशासनातील दोन महत्त्वाचे घटक असलेले जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी व पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्याविषयी जनमानसात आदराची भावना आहे. त्यांच्या कामाची पद्धत, सर्वसामान्यांमध्ये मिसळणे, त्यातून सामान्यांचे प्रश्न आणि समस्या जाणून घेणे, त्याचा उपयोग प्रशासकीय कामात गती आणणे आदींना होत आहे. ही जिल्ह्याच्या दृष्टीने नक्कीच चांगली बाब आहे. त्याबाबत कुणाचे दुमतही राहणार नाही.  दोन्ही प्रमुख अधिका:यांची जनमानसातील प्रतिमा जरी चांगली असली तरी या दोघांनी आता कठोर होणे अपेक्षीत आहे. यापूर्वीच्या घटनांमध्ये या दोन्ही अधिका:यांनी समन्वय आणि काही वेळा ठोस कारवाई करून संबधितांना ठिकाणावरही आणले आहे. परंतु काही समाजविघातक शक्ती पुन्हा डोकेवर काढू लागले आहेत. थेट अधिकारी, कर्मचा:यांवर हात उगारण्यातही मागेपुढे पाहिले जात नाही. अशांनाही वठणीवर आणण्यासाठी आता जिल्हाधिकारी व आणि पोलीस अधीक्षकांनी कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे. त्यासाठी समाजातील चांगल्या घटकांना सहभागी करून घेत सामाजिक दबाव अशा उपद्रवी लोकांवर आणने गरजेचे ठरणार आहे. काही मर्यादा येतीलही परंतु त्यातूनही मार्ग काढता येईल. आधी सुरुवात होणे अपेक्षीत आहे. एकूणच आगामी जिल्हा परिषदा त्यानंतर चार महिन्यांनी होणा:या लोकसभा आणि पुन्हा चार महिन्यांनी होणा:या विधानसभा निवडणुका लक्षात घेता प्रत्येक घटक आपला राजकीय, सामाजिक हेतू सिद्ध करण्यासाठी उपद्रवी लोकांना हाताशी धरून समाजविघातक कामे करून घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने आता कडक धोरण अवलंबून जनतेत विश्वास निर्माण करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.