शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
3
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
4
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
5
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा खोचक टोला
6
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
7
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
8
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
9
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
10
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
11
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
12
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
13
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
14
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
15
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
16
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
17
नेपाळमध्ये पंतप्रधान होताच बालेन शाह यांचा 'भारतविरोधी' अवतार! ४५ दिवसांत घेतले ४ मोठे निर्णय
18
Hardik Pandya: हार्दिक पांड्याने आधी अनफॉलो केलं, मग फॉलो केलं; गोंधळावर मुंबई इंडियन्सने दिली प्रतिक्रिया
19
Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यात महिनाभरात मृत्यू सात पटीने वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 12:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाने नंदुरबार तालुक्यात ५०० चा आकडा पार केला आहे तर जिल्ह्यात ८०० पार झाला ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाने नंदुरबार तालुक्यात ५०० चा आकडा पार केला आहे तर जिल्ह्यात ८०० पार झाला आहे. मृतांची संख्या देखील पन्नाशीच्या घरात पोहचली आहे. जिल्ह्यात एकुण ४५ जणांचे मृत्यू झाले असून त्यात फक्त नंदुरबार तालुक्यातीलच तब्बल २६ जणांचा समावेश आहे. नंदुरबारनंतर शहादा तालुका या आकडेवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे सुदैवाची बाब म्हणजे कोरोनामुक्तीचा आकडा देखील ५०० पार झाला आहे.
कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. अवघ्या ३५ दिवसात रुग्ण संख्या पाचपट, मृत्यूसंख्या सातपट वाढली आहे. कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही सुदैवाने सहापट झाली आहे. येत्या काळात वाढीचा हा दर कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. सामुहिक संसर्गापासून वाचण्यासाठी नागरिकांनीच आता स्वत:हून उपाययोजना करणे आवश्यक आहे.
रुग्णसंख्या ८०० पार
जिल्ह्यतील रुग्णसंख्या आता ८५२ झाली आहे. ३५ दिवसांपूर्वी अर्थात ३ जुलै रोजी रुग्णसंख्या अवघी १६३ इतकी होती. ती महिनाभरात तब्बल पाचपट वाढली आहे. वाढीचा हा वेग कमी करणे आवश्यक आहे. अर्थात स्वॅब तपासणीची संख्या पूर्वीपेक्षा दुप्पट झाल्याने रुग्ण संख्या वाढीचा वेग देखील वाढला असल्याचे प्रशासनाचे म्हणने आहे. रुग्ण वाढीचा वेग असाच कायम राहिला तर येत्या दहा दिवसात बाधीतांची संख्या हजाराचा टप्पा पार करेल अशी भिती आहे. त्यामुळे कोरोना साखळी तोडणे आता गरजेचे आहे.
नंदुरबार तालुका ५०० पार
जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण हे नंदुरबार शहरासह तालुक्यात आढळले आहेत. आतापर्यंत तब्बल ५२७ जण कोरोनाबाधीत झाले आहेत. त्यातील २६ जणांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. अर्थात इतर तालुक्याच्या तुलनेत नंदुरबार तालुक्यात सर्वाधिक अर्थात २,८४० जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
नंदुरबार तालुक्यात कोरोनामुक्तीची संख्या देखील अधीक आहे. आतापर्यंत ३२४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या १४३ जण उपचार घेत आहेत.
नंदुरबार खालोखाल शहादा तालुका आहे. शहादा तालुकाही २०० च्या घरात गेला आहे. बाधितांची संख्या सद्य स्थितीत २०४ इतकी आहे. त्यातील १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ११६ जण बरे झाले आहेत. तालुक्यातील १,१४४ जणांचे स्वॅब तपासण्यात आले आहेत.
तळोदा तालुक्यात रुग्णसंख्या पन्नाशी पार झाली आहे. एकुण ५७ जण आतापर्यंत बाधीत आढळले. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. २९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तालुक्यात २९८ जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. नवापूर तालुक्यात ३९ जण बाधीत आढळले आहेत. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. १५ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
अक्कलकुवा तालुक्यात १९ जण बाधीत झाले. त्यापैकी १७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. धडगाव तालुक्यात एकच जण बाधीत झाला व तोही कोरोनामुक्त झाला आहे.
रविवारी दिवसभरात एकुण ३३ जण बाधीत आढळले. त्यात सर्वाधिक नंदुरबार शहरातील ११ तर नवापूर शहरातील १० जणांचा समावेश आहे. याशिवाय नंदुरबार शहरातील एका बाधीताचा उपचार घेतांना मृत्यू झाला. एकुण बाधीत संख्या साडेआठशेपेक्षा अधीक गेली आहे. कोरोनाचा वाढता आकडा आता हजाराच्या घरात पोहचला आहे. दुसरीकडे कोरोनामुक्तही वेगाने होत आहे.