आराळे येथे गटारीच्या बांधकामाच्या वादातून महिला सरंपचाचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 15:55 IST2018-11-11T15:54:56+5:302018-11-11T15:55:01+5:30

किरकोळ वाद : जातीवाचक शिवीगाळ करुन धमकी

Murdered women constable in Aaral dispute | आराळे येथे गटारीच्या बांधकामाच्या वादातून महिला सरंपचाचा विनयभंग

आराळे येथे गटारीच्या बांधकामाच्या वादातून महिला सरंपचाचा विनयभंग

नंदुरबार : तालुक्यातील आराळे येथे ग्रामपंचायतीने केलेले गटारीचे काम व्यवस्थित नसल्याचे सांगून महिला सरपंचासोबत वाद घालत हात धरुन विनयभंग केल्याची घटना घडली़ याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े 
आराळे ग्रामपंचायतीने गावातील विविध भागात गटारींच्या बांधकाम केले होत़े  गावातील रघुनाथ गिरासे यांच्या घरासमोरही गटारीचे काम झाले होत़े हे काम निकृष्ट असल्याची तक्रार त्यांनी महिला सरपंचाकडे लावून धरली होती़ यावर उत्तर देताना सरपंचांनी मजूर लावून दुरुस्त करुन देण्याचे आश्वासन दिले होत़े यानंतर हा वाद मिटला होता़ मात्र आठ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास रघुनाथ गिरासे, कल्पेश रघुनाथ गिरासे, जयपाल रजेसिंग गिरासे, पराग रघुनाथ गिरासे या चौघांनी महिला सरपंचांच्या घरी जाऊन वाद घातला होता़ वाद सुरु असताना कल्पेश गिरासे याने सरपंचांचा हात धरुन ओढाताण करत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत विनयभंग केला़ तसेच इतरांनी जातीवाचक शिवीगाळ करत जिवेठार मारण्याची धमकी दिली़ 
याप्रकरणी महिला सरपंचाच्या फिर्यादीवरुन चौघांविरोधात नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े  तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश अहिरे करत आहेत़ 
दरम्यान संशयितांना पोलीसांनी चौकशीसाठी बोलावल्याची माहिती देण्यात आली आह़े या घटनेमुळे नंदुरबार तालुक्यातील राजकीय वतरुळात खळबळ उडाली आह़े 
 

Web Title: Murdered women constable in Aaral dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.