चिखलामुळे वाहनधारक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 13:16 IST2020-08-28T13:10:01+5:302020-08-28T13:16:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील मोरंबा-कुंडी ते होराफळी या घाट सेक्शनच्या रस्त्यावर चिखल झाल्याने वाहनधारकांना त्रासदायक होऊन ...

चिखलामुळे वाहनधारक त्रस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील मोरंबा-कुंडी ते होराफळी या घाट सेक्शनच्या रस्त्यावर चिखल झाल्याने वाहनधारकांना त्रासदायक होऊन वाहने चिखलात फसत असल्याने हाल होत आहेत. या समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याने वाहनधारकांना अखेर चिखलात दगड-गोटे गोळा करून चिखलातील खड्ड्यात टाकून वाहने निघतील अशी तात्पुरती डागडूजी करण्याची वेळ आली आहे.
चार-पाच दिवसापूर्वी याच रस्त्यावर दरीजवळील वळणावर भाग खचून धोकेदायक झाला होता. त्याठिकाणीही वाहनधारकांनीच खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी दगड ठेवून वाहनधारकांना खचलेल्या रस्त्यापासून सावधान केले होते. अक्कलकुवा तालुक्यातील व सातपुड्याच्या अतिदुर्गम घाट सेक्शनच्या मोरंबा- कुंडी ते होराफळी या घाट सेक्शनच्या रस्त्याची पावसाळ्यापूर्वीच दुरवस्था झाली होती. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. होराफळी गावाजवळील रस्त्याची अत्यंत वाईट परिस्थिती आहे. याठिकाणी रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे असल्याने त्यात पावसाचे पाणी साचून चिखलमय होऊन वाहनधारकांना वाहन काढताना गैरसोयीचे व त्रासदायक होत आहे. वाहने चिखलात फसून जात असल्याने साधी मोटारसायकल काढायला दोन-तीन लोकांनी ढकलून उचलून काढावी लागत आहे.
दररोजची होणारी गैरसोय व फजिती बघता संबंधित बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे वाहनधारकांवरच चिखलमय खड्ड्यात दगड-गोटे टाकून तात्पुरती दुरूस्ती करण्याची वेळ आली आहे. या रस्त्याची पावसाळ्यापूर्वीच दुरवस्था झाली होती व पावसामुळे अधिक भर पडत रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचून रस्त्यावर सर्वत्र गुडघाभर चिखल झाला आहे. चार-पाच दिवसापूर्वी वळणावर दरीचा काही भाग खचून रस्ता धोकेदायक झाला होता. त्यामुळे वाहनधारकांना खचलेचा भाग रात्रीच्यावेळी लक्षात यावा यासाठी वाहनधारकांनी जागोजागी दगड ठेवून धोका दर्शविला होता. या कुंडी-होराफळी दरम्यान घाट सेक्शनच्या रस्त्यावर खड्ड्यातील चिखलामुळे होराफळी, खडकापाणी, तिनखुन्या, मोरखी, वालंबा, माल्याआंबा, तोबीकुवा, टोकणापिप्री, गुजरात बॉर्डरच्या परिसरातील वाहनधारकांना गैरसोयीचे व त्रासदायक झाले असून संबधित विभागाने घाट सेक्शनच्या रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.