प्रेमविवाहाच्या वादातून जावाईकडून सासूचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 12:19 IST2020-05-23T12:19:46+5:302020-05-23T12:19:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रेम विवाह केलेल्या मुलीला भेटण्यास आलेल्या तिच्या आईचा जावयाने विनयभंग केल्याची घटना नंदुरबारात घडली. ...

प्रेमविवाहाच्या वादातून जावाईकडून सासूचा विनयभंग
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : प्रेम विवाह केलेल्या मुलीला भेटण्यास आलेल्या तिच्या आईचा जावयाने विनयभंग केल्याची घटना नंदुरबारात घडली. दरम्यान, जावयानेही फिर्याद दिली असून कोर्टमॅरेज केले म्हणून सासरच्या मंडळींने मारहाण केल्याचे म्हटले आहे.
राहुल काशिनाथ दाणे, रा.पारंबी, ता.मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव असे संशयीय जावयाचे नाव आहे. दाणे यांनी चिखली, जिल्हा बुलढाणा येथील तरुणीशी प्रेम विवाह केला आहे. दोघांनी पळून जावून कोर्ट मॅरेज केल्याचे चिखली येथील मुलीकडच्या लोकांचे म्हणने आहे. मुलीच्या आईच्या फिर्यादीनुसार, मुलीला भेटण्यासाठी आपण नंदुरबार येथील हरीभाऊ नगर येथील घरी गेलो. तेथे आल्याचा राग येवून जावई राहुल दाणे याने मुलीची आई व नातेवाईकांना शिविगाळ केली. आम्ही कायदेशीर लग्न केल्याचे सांगून मुलीच्या आईशी धक्काबुकी करून विनयभंग केला. तसेच नातेवाईकांना धमकी दिली. याबाबत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून राहुल दाणे याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर राहुल दाणे यानेही पोलिसात फिर्याद दिली आहे. कोर्ट मॅरेज केल्याचा राग येवून मुलीकडील नातेवाईकांनी घरी येवून आपल्याला मारहाण करून शिविगाळ केल्याचे म्हटले आहे. त्यांच्या फिर्यादीवरून उर्कडराव बलकार, मुलीची आई, निलेश बलकार व एक युवक रा.चिखली, जि.बुलढाणा व अशोक डहाळे, रा.अकोला, अशोक खरडे रा.पातुर, जि.अकोला यांच्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक राहुुल शेजवळ व हवालदार वसावे करीत आहे.