शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

नाशिक विभागात नंदुरबार जिल्ह्यात मनरेगाचे सर्वाधिक मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 12:25 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊनमुळे परराज्यात अडकलेले मजूर गावी परतल्याने या मजुरांना रोजगार देण्यासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांना यश येत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लॉकडाऊनमुळे परराज्यात अडकलेले मजूर गावी परतल्याने या मजुरांना रोजगार देण्यासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांना यश येत असून त्यामुळे मनरेगावरील कामांवरील मजुरांची संख्या तब्बल ५० हजाराच्या घरात गेली आहे. विशेष म्हणजे नाशिक विभागात जिल्ह्यात सर्वाधिक मजूर कामावर असल्याची नोंद झाली आहे.परजिल्ह्यात आणि परराज्यात अडकलेले हजारो मजूर जिल्ह्यात परतू लागले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील बहुतांश मजुर गुजरात राज्यात जातात गेल्या महिन्यातच हे मजूर परतल्याने १४ दिवसांच्या क्वॉरंटाईननंतर या मजुरांना रोहयोच्या कामांकडे वळविण्यात प्रशासनाला यश येत आहे. जिल्ह्यात रोजगाराची साधने नसल्याने आणि दारिद्रय रेषेखालील कुटूंबांची संख्या ७० टक्केपेक्षा अधीक असल्याने लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यातील जनतेला पुरेसे अन्नधान्य अथवा रोजगार उपलब्ध करून देणे प्रशासनापुढे आव्हान होते. ही बाब जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी लक्षात घेवून सुरुवातीपासूनच धान्य वाटप व रोहयोच्या कामांकडे लक्ष घालून त्याचे नियोजन केले.मजूर परतण्यापूर्वीच सुमारे ६० हजार मजुरांना रोजगार मिळेल इतक्या कामांना तांत्रिक मंजुरी दिली होती. त्यामुळे मजूर परतल्यानंतर या मजुरांना ज्यांनी काम मागितले त्यांना काम देण्याला प्राधान्य दिले जात असल्याने अवघ्या तीन आठवड्यात रोहयोची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू झाली असून या कामांवरील मजुरांची संख्याही वाढली आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात ४,३३० कामांवर ४६ हजार २९४ मजूर कामावर आहेत. लवकरच ही संख्या ५० हजारांवर जाणार आहे. तालुकानिहाय सुरू असलेली कामे व त्यावरील मजूर पुढील प्रमाणे, अक्कलकुवा तालुक्यात ६०७ कामांवर ७,८०१ मजूर कार्यरत आहेत. धडगाव तालुक्यात ४५० कामांवर १२,२३४ मजूर उपस्थित आहेत. नंदुरबार तालुक्यात ६६० कामांवर सहा हजार ४६ मजूर उपस्थित आहेत.नवापूर तालुक्यात ७४१ कामांवर ९,१८० मजूर कार्यरत आहेत. शहादा तालुक्यात एक हजार ५३ कामांवर ६,६०८ मजूर कार्यरत आहेत. तर तळोदा तालुक्यात ८१९ कामांवर ४,२२५ मजूर कार्यरत आहेत. यात जॉबकार्ड नसलेले १४,९६० मजुरांचा समावेश आहे.एकुण कामांवरील मजुरांची संख्या तब्बल ५० हजारापेक्षा अधीक जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने ठेवलेल्या लक्षांकापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न आहे. मजुरांनी आपल्या परिसरातच काम उपलब्ध व्हावे यासाठी कामाची मागणी करावी असे आवाहन देखील जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

जिल्ह्यात मागेल त्याला काम देण्याचे नियोजन प्रशासनाने केले असून रोहयोच्या कामाचे पुर्वनियोजन केल्यामुळे आज मोठ्या प्रमाणावर मजुरांना काम देता येत आहे.-डॉ.राजेंद्र भारूड, जिल्हाधिकारी.