शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

६० पेक्षा अधीक वयाच्या व्यक्तींचे सर्वाधिक मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 12:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनामुळे जिल्ह्यात ६० वर्ष वयापेक्षा अधीक वय असलेल्या व्यक्तींचा सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. तर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनामुळे जिल्ह्यात ६० वर्ष वयापेक्षा अधीक वय असलेल्या व्यक्तींचा सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. तर शून्य ते २४ वयोगटातील एकाचाही मृत्यूत समावेश नाही. दरम्यान, जिल्ह्यात मृत्यूदर कमी झाला असून कोरोनामुक्तीचा दर देखील वाढला आहे. नंदुरबारात कोरोनाचा पहिला रुग्ण १८ एप्रिल रोजी आढळला होता. त्यानंतर महिनाभर बाधितांची संख्या फारशी वाढली नाही. परंतु जून महिन्यापासून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. दिवाळीच्या आधी देखील संख्या कमी झाली, परंतु दिवाळीनंतर त्यात पुन्हा वाढ होऊ लागली आहे. आता शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत. सर्व व्यवहार रुळावर आले आहेत. असे असतांना रुग्ण संख्या देखील दररोज ३० पर्यंत जात आहे. जिल्ह्यात मृत्यू दर हा अडीच ते तीन टक्केच्या आत राहिला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये सर्वाधिक पुरुष आहेत. वयोगटाचा विचार करता शून्य ते २४ वयोगटातील मृत्यू संख्या शून्य आहे. ४६ ते ६० आणि ६० वर्ष वयावरील बाधितांचा सर्वाधिक मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या संदर्भातील भिती आता काहीशी कमी झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. व्यवहार सुरळीत होऊ लागला असून अनेकांच्या नोकऱ्या, व्यवसाय यावर गदा आलेली आहे. त्यामुळे रोजगाराचा शोध अद्यापही काही ठिकाणी सुरू असल्याचे दिसून येत आहे. 

होम आयशोलेशन बंद...रुग्ण संख्या वाढत होती त्यावेळी शासकीय यंत्रणेवर ताण पडत होता. रुग्णांना बेड मिळत नव्हते. क्वॅारंटाईन केंद्रे हाऊसफूल्ल होत होती. त्यामुळे शासनाने कमी लक्षणे व ज्यांना लक्षणेच नाहीत अशा रुग्णांना घरीच आयशोलेशन होऊन उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. परंतु त्याचा दूरपयोग होऊ लागला होता. बाधीत व्यक्ती परिसरात फिरण्यासह त्याच्याकडून काळजी घेतली जात नव्हती. अशातच रुग्ण संख्या देखील वाढू लागल्याने शेवटी होम आयशोलेशनचा निर्णय रद्द करावा लागला. त्यामुळे आता बाधीत प्रत्येक रुग्णाला शासकीय रुग्णालय किंवा खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावा लागतो आहे. 

जुलै, ॲागस्ट, सप्टेंबरमध्ये सर्वाधिक मृत्यूगेल्या ११ महिन्याच्या काळात सर्वाधिक मृत्यू संख्या ही जुलै ते ॲागस्ट महिन्यात झाली आहे. त्यानंतर मध्यंतरी मृत्यू संख्या कमी झाली परंतु डिसेंबर व जानेवारी महिन्यात त्यात पुन्हा वाढ झाली. जुलै महिन्यात ३०, ॲागस्ट महिन्यात ४८, सप्टेंबर महिन्यात ४० जणांचा मृत्यू झाला होता. डिसेंबर महिन्यात १८ तर जानेवारी महिन्यात ३३ जणांचाा मृत्यू झाला आहे. मृत्यू संख्या सर्वाधिक ही शहादा व नंदुरबार तालुक्यातील आहे तर सर्वात कमी धडगाव व अक्कलकुवा तालुक्याील असल्याचे चित्र आहे.