देश विकासासाठी मोदी सरकार अग्रेसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 12:10 IST2020-06-12T12:10:38+5:302020-06-12T12:10:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मोदी सरकारने वर्षभरात विविध ऐतिहासिक निर्णय घेवून देशाचा विकास आणि आत्मनिर्भरतेसाठी पुढचे पाऊल टाकले ...

Modi government is a leader for the development of the country | देश विकासासाठी मोदी सरकार अग्रेसर

देश विकासासाठी मोदी सरकार अग्रेसर

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मोदी सरकारने वर्षभरात विविध ऐतिहासिक निर्णय घेवून देशाचा विकास आणि आत्मनिर्भरतेसाठी पुढचे पाऊल टाकले आहे. कोरोनाच्या तीन महिन्याच्या काळात खंबीर भुमिका घेवून इतर देशांच्या तुलनेत कोरोनाचा फैलाव रोखने आणि मृत्यूदर कमी राखण्यात देखील मोदी सरकारने यश मिळविल्याचा दावा खासदार डॉ.हिना गावीत यांनी पत्रकार परिषदेत केला.
मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त वर्षभराच्या काळात घेतलेले निर्णय, कोरोना महामारीच्या संदर्भातील केंद्र शासनाच्या उपाययोजना याची माहिती देण्यासाठी खासदार डॉ.हिना गावीत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमदार डॉ.विजयकुमार गावीत उपस्थित होते. त्यांनी सांगितले, गेल्या वर्षभराच्या कालावधीत अनेक महत्वाचे निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतले आहेत. सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे घटनेचे कलम ३७० हटविण्यात आले. जम्मू आणि कश्मिरमध्ये भारताचे संविधान त्यामुळे पुर्णपणे लागू झाले.
लड्डाख आणि जम्मू-कश्मिर हे दोन केंद्र शासीत प्रदेश निर्माण झाले. राम मंदीराचा मार्ग मोकळा झाला. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय घेताच न्यास स्थापन करून मंदीर उभारणीच्या कामाला चालना दिली.
तिहेरी तलाक रद्द केले. नागरिकत्व सुधारणा कायदा २०१९ लागू केला. दहशतवादावर कठोर कारवाईसाठी सुधारणा विधेयक मंजूर केले. बँकांचे विलीनिकरण, चीफ आॅफ डिफेन्स स्टाफ, आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, अटल भूजल योजना, प्रधानमंत्री किसान पेन्शन योजना यासह इतर महत्वाचे निर्णय घेवून देश विकासाला चालना दिल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोना फैलाव रोखण्यात, त्याचा मृत्यूदर कमी राखण्यात, जास्तीत जास्त कोरोना चाचणी घेण्यात देश आघाडीवर राहिला. एन-९५ व पीपीई किट तयार करण्यात भारत आत्मनिर्भर झाला. प्रगत देशाच्या तुलनेत भारतातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. १४ देशांमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्याही भारतातील मृत्यूसंख्येच्या तुलनेत ५५.२ पट इतकी आहे.
लॉकडाऊनच्या काळात एक लाख ७० हजार कोटी रुपयांचे पॅकेज, धान्य वाटप, ८ कोटी घरांमध्ये तीन गॅस सिलींडर मोफत देणे, मनरेगाच्या अंतर्गत १३ कोटी ६२ लाख कुटूंबांना लाभ दिला गेला. ३८० श्रमिक ट्रेन चालवून ५२ लाख स्थलांतरीतांना त्यांच्या भागात पोहचविले. लॉकडाऊनपूर्वी १४४४ भारतीय नागरिकांना भारतात आणल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Modi government is a leader for the development of the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.