जिल्ह्यात सुक्ष्म सिंचन क्षेत्र वाढविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 11:58 IST2020-05-02T11:57:56+5:302020-05-02T11:58:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात सूक्ष्म सिंचन सुविधा वाढविण्यावर भर द्यावा आणि वनपट्टयात बांधलेल्या विहिरींसाठी वीज कनेक्शन देण्यासाठी ...

जिल्ह्यात सुक्ष्म सिंचन क्षेत्र वाढविणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात सूक्ष्म सिंचन सुविधा वाढविण्यावर भर द्यावा आणि वनपट्टयात बांधलेल्या विहिरींसाठी वीज कनेक्शन देण्यासाठी प्रयत्न करावा असे निर्देश आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड.के.सी.पाडवी यांनी दिले.
खरीप हंगाम आढावा व नियोजन बैठक पालकमंत्री अॅड.पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळवून देण्यासाठी बँक अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात यावी. कापूस खरेदी वेळेवर सुरू होईल यासाठी तातडीने उपाययोजना करावी. शेतकºयांना खते, बियाणे आणि इतर कृषी निविष्ठा वेळेवर मिळतील यादृष्टीने नियोजन करण्यात यावे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शेतकºयांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील बंधाºयांच्या दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण होईल याचे नियोजन करावे. लघु पाटबंधारे विभागाच्या बंधाºयांच्या दुरुस्तीसाठीचे अंदाजपत्रक त्वरीत सादर करावे, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या. खरीप हंगाम २०२०-२१ साठी एकूण ३८ हजार ६६८ क्विंटल बियाण्यांची मागणी कृषी आयुक्तालयाकडे करण्यात आली होती. त्यानुसार बियाणे उपलब्ध होणार आहे.
महाबीजमार्फत बियाण्याची उपलब्धता होणार आहे. खरीप हंगामासाठी १ लाख १८ हजार १६० मे.टन खतांची मागणी करण्यात आली असून १ लाख १० हजार ८७५ मे.टन खते उपलब्ध होणार आहेत.किटकनाशके फवारणीबाबत शेतकºयांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. कृषी निविष्ठा विषयक तक्रारींचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी कापूस पिकाबाबत शेतकºयांमध्ये जागृती करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
बैठकीला सर्व लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.