नवापुरात तहसीलदारांच्या उपस्थितीत पालकांची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:50 IST2021-05-05T04:50:00+5:302021-05-05T04:50:00+5:30
यावेळी तहसीलदार कुलकर्णी यांनी सांगितले कोविडची लस ही अत्यंत सुरक्षित असून, ती कोविडपासून बचाव करते. लस म्हणजे कवच आहे. ...

नवापुरात तहसीलदारांच्या उपस्थितीत पालकांची बैठक
यावेळी तहसीलदार कुलकर्णी यांनी सांगितले कोविडची लस ही अत्यंत सुरक्षित असून, ती कोविडपासून बचाव करते. लस म्हणजे कवच आहे. यामुळे महागड्या औषधाची गरज पडत नाही. कोविड लसीबाबत होत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नका. गैरसमज मनातून काढून टाका. प्रत्येक ग्रामस्थांना लसी घेण्याबाबत सविस्तर माहिती द्या. कोविडची ही लस अत्यंत सुरक्षित असून, प्रत्येक ग्रामस्थांनी ती घेतली पाहिजे. जास्तीत जास्त लसीकरण सर्वांच्या फायद्याचे आहे. गावात सर्वांनी मास्क, फिजिकल डिस्टन, बाहेरून आल्यावर हात-पाय धुतले पाहिजे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, गावात कोणी आजारी असेल त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जाऊन उपचार केले पाहिजे. आपण सुरक्षित तर आपले गाव सुरक्षित असणार आहे. आपल्या गावाच्या आरोग्यासाठी सर्वांनी जागृत राहून कोरोनामुक्त गावासाठी प्रयत्न करावे. जास्तीत जास्त लसीकरण व त्याबाबत जनजागृतीसाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
यावेळी डाॅ. अविनाश मावची यांनी ग्रामीण भागातील ग्रामस्थांना आरोग्याविषयी घ्यावयाची काळजी व कोविड लसीबाबत सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले. बैठकीत गटविकास अधिकारी सी. के. माळी, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, डॉ.अविनाश मावची, नायब तहसीलदार जितेंद्र पाडवी आदी उपस्थित होते.