शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
3
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
4
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
5
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
6
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
7
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
8
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
9
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
10
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
11
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
12
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
13
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
14
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
15
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
16
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
17
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
18
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
19
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
20
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार

नंदुरबार जिल्ह्यात कागदावरच कमी होतेय कुपोषण, फेरसर्वेक्षणाच्या आकडेवारीत साडेचार पटीने वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2018 11:01 AM

राज्यात कुपोषणाच्या बाबतीत सर्वात संवेदनशील असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातच प्रशासन कुपोषणाचे प्रमाण कागदावरच कमी होत असल्याचे चित्र उघड झाले आहे.

- रमाकांत पाटीलनंदुरबार : राज्यात कुपोषणाच्या बाबतीत सर्वात संवेदनशील असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातच प्रशासन कुपोषणाचे प्रमाण कागदावरच कमी होत असल्याचे चित्र उघड झाले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नव्याने झालेल्या कुपोषित बालकांच्या सर्वेक्षणात अतिकुपोषित बालकांच्या आकडेवारीत साडेचार पटीने वाढ झाली आहे.सातपुड्यातील कुपोषण आणि बालमृत्यूचा प्रश्न राज्यातच नव्हे तर देशात गाजले आहेत. येथील कुपोषित बालकांची संख्या आणि बालमृत्यूचे प्रमाण राज्यात जास्त येत असल्याने गेल्या काही वर्षापासून कुपोषित बालकांची संख्या आणि बालमृत्यू कागदावरच कमी केले जात असल्याचा संशय वेळोवेळी व्यक्त झाला आहे. गेल्या १५ वर्षांपूर्वी राज्यातील सरासरी बालमृत्यूचे प्रमाण त्याकाळी ४८ असताना नंदुरबार जिल्ह्यातील हे प्रमाण केवळ २१ दाखविण्यात आले होते. त्यावेळी संशय व्यक्त झाल्याने शासनाने दखल घेतली आणि नव्याने सर्वेक्षण झाले तेव्हा ते प्रमाण २१ वरून ५३ वर गेले होते. सध्यादेखील चित्र यापेक्षा वेगळे नाही.यावर्षी एप्रिल २०१८ मध्ये जिल्ह्यातील अतिकुपोषित बालकांची संख्या केवळ ८२९ होती. प्रशासनानेच यासंदर्भातील वेळोवेळी दिलेल्या अहवालात आकडेवारीत फारसा बदल दिसून येत नव्हता. मात्र प्रत्यक्षात कुपोषणाचे प्रमाण जिल्ह्यात जास्त असल्याच्या तक्रारी वाढल्याने जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी कुपोषित बालकांचे नव्याने सर्वेक्षण करून वास्तव अहवाल तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गेल्या दोन महिन्यात जिल्ह्यातील कुपोषित बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणानुसार जवळपास साडेचार पटीने कुपोषित बालकांची संख्या वाढली आहे.एप्रिल २०१८ मध्ये धडगाव तालुक्यातील अतिसंवेदनशील कुपोषित बालकांची संख्या ४०९ होती. ती आता एक हजार १७५ झाली आहे. अक्कलकुवा तालुक्यातील संख्या १९० होती ती आता ७१६ झाली आहे. तळोदा तालुक्यातील संख्या ८३ होती ती नवीन सर्वेक्षणात ६२७ झाली आहे. शहादा तालुक्यात संख्या केवळ ५९ होती ती आता ७५४ झाली आहे. नवापूर तालुक्यात अतिकुपोषित बालके एप्रिल २०१८ केवळ २१ होती ती आता २८० झाली आहेत तर नंदुरबार तालुक्यात ही संख्या ६७ होती ती आता १३५ झाली आहे. यातही काही केंद्रांचे सर्वेक्षण बाकी आहे. एकूणच एप्रिल २०१८ मध्ये अतिकुपोषित बालके ८२९ होती ती नवीन सर्वेक्षणात तीन हजार ६८७ झाली आहे.यावरूनच कुपोषणाचे प्रमाण महिला व बालकल्याण विभाग केवळ कागदावरच कमी होत असल्याचे चित्र रंगवत असल्याचे उघड झाले आहे. वास्तविक कुपोषित बालकांचे बारकाईने सर्वेक्षण करून वास्तव चित्र समोर आल्यास प्रभावी उपाययोजना करण्यास प्रशासनाला मदत मिळणार आहे. त्यामुळे यासंदर्भात सरकारने गांभीर्याने दखल घेण्याचे आवश्यकता आहे.