नवापूर तालुक्यातील महामार्गाचे रखडलेले काम दोन डिसेंबरपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 13:01 IST2019-11-28T13:01:00+5:302019-11-28T13:01:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील बेडकी ते कोंडाईबारी हा नवापुर तालुक्यातील रस्ता दुरुस्त न झाल्यास ...

नवापूर तालुक्यातील महामार्गाचे रखडलेले काम दोन डिसेंबरपासून
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील बेडकी ते कोंडाईबारी हा नवापुर तालुक्यातील रस्ता दुरुस्त न झाल्यास आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला होता़ नागरिकांच्या या इशा:यानंतर दोन डिसेंबरपासून कामाला पुन्हा सुरुवात होणार असल्याची माहिती महामार्ग प्राधिकरणच्या अधिका:यांनी दिली आह़े
‘लोकमत’ने याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर तहसीलदार सुनिता ज:हाड यांनी महामार्ग प्राधिकरणच्या अधिका:यांसोबत चर्चा केली होती़ यानंतर महामार्ग प्राधिकरणच्या अधिका:यांनी हे आश्वासन दिले आह़ेनागरिकांच्या इशा:यानंतर नवापूर तहसीलदार सुनीता ज:हाड आणि पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या उपस्थितीत बुधवारी तक्रारदार नागरिक आणि महामार्ग विभागाचे अधिकारी सुरुवात करणार असल्याचे आश्वासन नहीचे प्रबंधक अरविंद काळे, व्यवस्थापक रविंद्र इंगोले, इंजिनियर पाटील यांच्यात बैठक घेण्यात आली होती़ या बैठकीत 2 डिसेंबर पासून रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर तक्रारदारांकडून आंदोलन स्थगित करण्यात आल़े
नवापूर शहरातील टॅक्सी व खाजगी वाहन चालक आणि मालक संघटना तसेच सामाजिक कार्यकर्ता यांनी 2 डिसेंबर रोजी रास्ता रोको करण्याचा इशारा नवापूर तहसीलदार आणि पोलिस निरीक्षक यांना निवेदना द्वारे दिला होता. ‘लोकमत’ने हे वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्राधिकरणच्या अधिका:यांनी तातडीने तालुका प्रशासनासोबत संपर्क केला होता़ बैठकीस उपस्थित निवेदनकत्र्यानी 2 डिसेंबर रोजी कामाला सुरुवात न केल्यास प्रशासनाला कोणतीही माहिती न देता आंदोलन करण्याचा इशारा दिला आह़े
नंदुरबार व साक्री तालुक्यातील मेंढपाळ मेंढय़ा चारण्यासाठी तळोदा तालुक्यातील विविध गावांमध्ये स्थायीक झाले आहेत. त्यापैकी रांझणी येथे एका शेतातील एका मेंढय़ांच्या कळपावर बिबटय़ाने हल्ला केला. त्यात दोन मेंढय़ा फस्त करीत मेंढपाळांचे 20 हजाराचे नुकसान केल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे तळोदा तालुक्यात वारंवार बिबटय़ा येत असल्यामुळे तेथे वास्तव्यास असलेल्या मेंढपाळांसाठी मेंढय़ा वाचविणे जिकरिचे ठरत आहे.