रेल्वेतून सहकाऱ्यांना सोडून पळाला व जीव गमावून बसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:21 IST2021-07-02T04:21:21+5:302021-07-02T04:21:21+5:30

परंतु त्याला कुणी व का मारले, हा शोध घेणे मोठे आव्हान होते. त्यामुळे चौघांवर आधी संशय व्यक्त करून त्यांना ...

Leaving his colleagues on the train, he ran away and lost his life | रेल्वेतून सहकाऱ्यांना सोडून पळाला व जीव गमावून बसला

रेल्वेतून सहकाऱ्यांना सोडून पळाला व जीव गमावून बसला

परंतु त्याला कुणी व का मारले, हा शोध घेणे मोठे आव्हान होते. त्यामुळे चौघांवर आधी संशय व्यक्त करून त्यांना भरूच येथून नंदुरबारात आणण्यात आले. एलसीबीने त्यांच्याकडून सविस्तर चौकशी केली, परंतु माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे गुन्हा घडून चार दिवस झाले तरी पथकांना यश येत नव्हते. अशातच ३० जून रोजी एका खबऱ्याने माहिती दिली. २५ रोजी रात्रीच्या वेळी नवीन वसतिगृहाच्या बांधकामाजवळील रस्त्यावर भालेर येथील भिक्या व त्याच्यासोबतचे दोनजण एका तरुणाला मारहाण करीत होते, अशी माहिती दिली. त्यावरून भालेर येथील भिक्याचा तपास केला असता तो भिका गैंदल पाटील हा तरुण असल्याचे निष्पन्न झाले. त्याला घडलेल्या घटनेबाबत विचारले असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची माहिती दिली. त्याला पुन्हा विश्वासात घेतले असता त्याने गुन्ह्याची सविस्तर माहिती दिली.

२५ जून रोजी रात्री नऊ ते साडेनऊ वाजेच्या सुमारास आपल्यासह प्रकाश हिरामण पाटील, मुकेश गैंदल पाटील असे मोटरसायकलने नंदुरबारकडे जात असताना रस्त्यात एका अनोळखी व्यक्तीने त्यांना आरोग्य केंद्राच्या पुढे शिवीगाळ करून प्लॅस्टिकच्या पाईपने मारण्याचा प्रयत्न केला. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. तिघांनी त्या तरुणास लाकडी काठी, दगड व हाताबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्या तावडीतून तो पळून नेला. परंतु त्याला पुन्हा तिघांनी वसतिगृहाच्या बाजूला असलेल्या शेताकडे जाताना पकडले व तेथे पुन्हा मारहाण करून डोक्यात लाकडी काठी मारून गळा आवळला. त्यामुळे दीपक उराव याचा मृत्यू झाला. त्याला तेथेच सोडून तिघे पसार झाले. भिकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे कळताच मुकेश गैंदल पाटील व प्रकाश हिरामण पाटील हे फरार होण्याच्या तयारीत असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले.

दरम्यान, कुठलाही पुरावा, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, तांत्रिक पुरावा, सीसीटीव्ही फुटेज नसताना क्लिष्ट अशा गुन्ह्याची उकल करण्यात एलसीबीला यश आले आहे. तिघा संशयितांना तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक विजय पवार, उपविभागीय अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक देवराम गवळी, एलसीबीचे प्रभारी निरीक्षक रवींद्र कळमकर व त्यांच्या पथकाने केली.

Web Title: Leaving his colleagues on the train, he ran away and lost his life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.