शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

राजरंग- निवडणुकीच्या धामधुमीतही नेते मात्र सुस्तच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 13:16 IST

रमाकांत पाटील लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्याचे राजकारण खरे तर ग्रामीण राजकारणावर अवलंबून असते, असे सांगितले जाते. ग्रामीण राजकारण ...

रमाकांत पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार : जिल्ह्याचे राजकारण खरे तर ग्रामीण राजकारणावर अवलंबून असते, असे सांगितले जाते. ग्रामीण राजकारण जिकडे वळण घेते तिकडे जिल्ह्याचे राजकारणही फिरते; मात्र ग्रामपंचायतींच्या निवडणुका जेव्हा होतात तेव्हा मात्र गावातीलच गटातटात वादविवाद, चुरस रंगत असते. सध्यादेखील तेच चित्र ग्रामीण भागात पहायला मिळत आहे. जिल्ह्यातील ८७ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. निवडणुकीच्या या पहिल्या टप्प्यात सध्या तरी स्थानिक ग्रामस्थांचीच धावपळ होताना दिसून येत आहे. नेते मंडळींचा हस्तक्षेप मात्र फारसा दिसून येत नाही.ज्या ८७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत, त्यातील शहादा आणि नंदुरबार तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायती आदिवासी क्षेत्राबाहेरील आहेत. अर्थात या गावांवर बिगर आदिवासी सरपंच बसणार असल्याने या गावांतील राजकारण अधिकच तापले आहे. विशेष म्हणजे या दोन्ही तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे त्यातील जवळपास बहुतांश गावे हे नंदुरबारचे विद्यमान आमदार व माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या मतदारसंघातील आहेत. त्यामुळे या निवडणुकांना महत्त्व आले आहे. नंदुरबार विधानसभा मतदारसंघाला शहादा तालुक्यातील काही गावे जोडली आहेत. त्यातील ८० टक्के गावे ही नंदुरबार मतदारसंघातीलच आहेत. या गावांना भेटी दिल्या असता, ग्रामस्थांची अर्ज भरण्यासाठी धांदल सुरू असल्याचे दिसून येत आहे. नेत्यांच्या भेटी गावांना झालेल्या नाहीत. काही कार्यकर्ते नेत्यांकडे गेले; पण पाहू, बघू, करा... अशी उत्तरे मिळत असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे गावात वाद नको म्हणून काही कार्यकर्ते आपसांत समझोत्याचाही प्रयत्न करताना दिसून येत आहेत. या समझोत्यातून काही जागा बिनविरोध होण्याची शक्यता आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत शहादा तालुक्यातील या गावांचे काम आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्यातर्फे जि.प.चे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल व जि.प.चे विद्यमान कृषी सभापती अभिजित पाटील हे पाहत होते; मात्र नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत राजकारण बदलले. अभिजित पाटील हे भाजपच्या विरोधात अर्थात काँग्रेसचे उमेदवार होते. त्यातून डॉ.विजयकुमार गावित व अभिजित पाटील यांच्यातही काहीसा दुरावा वाढला आहे. सध्या या गावांच्या निवडणुकांवर जयपाल रावल व अभिजित पाटील यांचेच लक्ष असून, हे दोन्ही गट यावेळी एकमेकांच्या विरोधात लढण्याची शक्यताही ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून वर्तवली जात आहे. नंदुरबार तालुक्यातील ज्या गावांच्या निवडणुका आहेत त्यात प्रामुख्याने डॉ.विजयकुमार गावित व शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्या कार्यकर्त्यांचे वर्चस्व आहे. या गावांमध्येदेखील राजकारणाची चुरस रंगत आहे.तळोदा व शहादा तालुक्यातील ज्या गावांच्या निवडणुका आहेत तो भाग विद्यमान आमदार राजेश पाडवी यांच्या मतदारसंघात येतो. राजेश पाडवी मात्र गावागावापर्यंत पोहोचत आहेत. नव्हे तर त्यांनी बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींना ११ लाखांचे बक्षीसही जाहीर केले आहे. नवापूर आणि धडगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मात्र नेत्यांचा फारसा हस्तक्षेप नाही.एकूणच या निवडणुकांमुळे ग्रामीण भागातील शेकोट्या राजकीय गप्पांनी तापत आहेत. येत्या तीन ते चार वर्षांपर्यंत लोकसभा, विधानसभा व जिल्हा परिषद यापैकी कुठल्याही निवडणुका नसल्याने जिल्हास्तरावरील नेते सध्या तरी निवांत आहेत. हे नेते लांबूनच गावातील हालहवाल व राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे नेत्यांना सध्या तरी निवडणुकीच्या धामधुमीतही निवांतपणा मिळाला आहे.