जिल्ह्यातील १२ टक्के क्षेत्रावर खरीप पेरण्या, पावसाअभावी लागला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:21 IST2021-07-02T04:21:15+5:302021-07-02T04:21:15+5:30

तृणधान्य पिकामध्ये २ हजार १७९ हजार हेक्टरवर भात, ३ हजार ९५२ हेक्टर ज्वारी, २४ हेक्टर बाजरी, ६ हजार ६१ ...

Kharif sowing on 12% area of the district, break due to lack of rain | जिल्ह्यातील १२ टक्के क्षेत्रावर खरीप पेरण्या, पावसाअभावी लागला ब्रेक

जिल्ह्यातील १२ टक्के क्षेत्रावर खरीप पेरण्या, पावसाअभावी लागला ब्रेक

तृणधान्य पिकामध्ये २ हजार १७९ हजार हेक्टरवर भात, ३ हजार ९५२ हेक्टर ज्वारी, २४ हेक्टर बाजरी, ६ हजार ६१ हेक्टरवर मका, २ हजार ६१० हेक्टर तूर, १५ हेक्टरवर मूग, १ हजार ४१८ हेक्टर उडीद, १४३ हेक्टर भुईमूग, १० हेक्टर सूर्यफूल आणि १ हजार १९२ हेक्टरवर सोयाबीन पेरणी करण्यात आली आहे.

दरम्यान, जिल्ह्यात दरवर्षी सर्वाधिक लागवड क्षेत्र हे कापसाचे असते. यंदाही कापूस लागवड क्षेत्र वाढण्याचा अंदाज होता. परंतु निर्धारित १ लाख ५ हजार ६६१ हेक्टरपैकी अद्याप केवळ १७ हजार ४५३ हेक्टरवर कापूस लागवड पूर्ण करण्यात आली आहे. आतापर्यंत केवळ १६ टक्के कापूस लागवड पूर्ण करण्यात आल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. कापूस लागवडीचे क्षेत्र पाऊस पडल्यानंतर वाढण्याचा अंदाज असला तरीही गेल्या दोन वर्षात पडलेला कापसाचा दर आणि लाॅकडाऊनमुळे कापूस विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना करावी लागलेली कसरत यामुळे शेतकरी यंदा कापसाकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे.

पावसाअभावी पेरण्या लांबल्याचे सांगण्यात येत असतानाच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा शेतीच्या खर्चात १० ते १५ टक्के वाढ झाल्याची माहिती दिली जात आहे. यामुळेही शेतीकामांना ब्रेक बसल्याची माहिती दिली जात आहे. जिल्ह्यातील विविध भागात अद्याप पेरण्यांना पूर्ण भरात सुरुवात झालेली नसली तरी सात जुलैनंतर वेळोवेळी पाऊस कोसळल्यास पेरणीचे आकडे वाढण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तवण्यात येत आहे.

Web Title: Kharif sowing on 12% area of the district, break due to lack of rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.