सोने खरेदीतून गुंतवणूक वाढू लागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 12:16 IST2020-06-11T12:16:26+5:302020-06-11T12:16:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लग्न समारंभांवर आलेली मर्यादा, त्यातून वाचलेला खर्च आता सोने खरेदीतून गुंतवला जात आहे. त्यामुळे ...

सोने खरेदीतून गुंतवणूक वाढू लागली
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लग्न समारंभांवर आलेली मर्यादा, त्यातून वाचलेला खर्च आता सोने खरेदीतून गुंतवला जात आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यात असलेल्या लग्न समारंभातील कुटूंब सोने खरेदीसाठी गर्दी करीत आहे. याशिवाय इतरही जण सोने खरेदीकडे कल दाखवत असल्यामुळे सराफा बाजारात बऱ्यापैकी उलाढाल सुरू आहे.
लॉकडाऊनमुळे सर्वच उद्योग व्यवसाय अडचणीत आले आहेत. अनेकांना आर्थिकबाबीला सामोरे जावे लागत आहे. यातून सराफा व्यावसाय देखील सुटला नाही. तब्बल दोन महिने बंद राहिलेला हा व्यवसाय लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर गेल्या १५ दिवसांपासून सुरू झाला आहे. हळूहळू या व्यवसायाची गाडी रुळावर आली आहे. खरेदीसाठी देखील गर्दी होऊ लागली आहे. भाव लॉकडाऊनच्या आधीपेक्षा आता १० ते २० टक्के वाढला आहे. त्याचाही काही परिणाम व्यवसायावर दिसून येत नसल्याची स्थिती आहे.
गुंतवणुकीकडे कल
लग्न समारंभांवर आलेली मर्यादा, त्यातून वाचलेला खर्च आता सोने खरेदीतून गुंतवला जात आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यात असलेल्या लग्न समारंभातील कुटूंब सोने खरेदीसाठी गर्दी करीत आहे. याशिवाय इतरही जण सोने खरेदीकडे कल दाखवत असल्यामुळे सराफा बाजारात बºयापैकी उलाढाल सुरू आहे.
येत्या दीड ते दोन महिन्यात उलाढाल कायम राहणार असल्याचे सराफा व्यावसायिकांचे म्हणने आहे. लॉकडाऊननंतर सराफा बाजारात गर्दी आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बाजार सुरू राहत आहे. सध्या सोने खरेदीतून त्यात गुंतवणूक करण्याचा कल वाढल्याचे नंदुरबार जिल्हा सराफा असोसिएशनचे अध्यक्ष मनोज दिनानाथ श्रॉफ यांनी सांगितले.
कारागिरांना मदत
लॉकडाऊनमुळे दोन महिने सराफा बाजार बंदच होता. व्यवहार ठप्प होते, त्यामुळे अनेक लहान व्यावसायिकांची आणि कारागिरांची उपासमार झाली. यासाठी मात्र सराफा असोसिएशन धावून गेले. त्यांना दोन महिने मदत देत त्यांना सावरले गेले. नंदुरबार जिल्ह्यात दागीने घडविणारे बंगाली कारागिर मोठ्या प्रमाणावर आहेत. परंतू हे कारागिर परत आपल्या गावी गेले नाही. येथेच राहिले. असोसिएशनने त्यांना आधार दिला. त्यामुळे दागीने घडविण्यासाठी सद्य स्थितीत कुठलीही अडचण नसल्याचे असोसिएशनचे म्हणने आहे.
चांदी उलाढालीवर परिणाम
जिल्ह्यातील आदिवासी चांदीची मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. होळीच्या काळात तसेच परराज्यातून मजुरी करून परत आल्यावर चांदी खरेदीकडे या कुटूंबांचा कल असतो. यंदा मात्र लॉकडाऊनमुळे या खरेदीवर पाणी फिरले गेले. सलग दोन महिने व्यवसाय बंद असल्यामुळे चांदी विक्रीत मोठी तूट झाली. आता खरीप हंगामानंतरच चांदी खरेदीकडे कल राहील असा अंदाज आहे.
सोन्याच्या भावात लॉकडाऊनंतर १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. सोन्याच्या भावात वाढ झाली असली तरी खरेदीमध्ये मात्र कुठलाही परिणाम झालेला नाही. जुलै अखेरपर्यंत सराफा बाजारात तेजी कायम राहणार आहे.
लॉकडाऊनंतर सराफा व्यवसाय आता रुळावर आला आहे. सोन्यातील गुंतवणूक आता वाढीस लागली आहे. लग्न समारंभांवर आलेली खर्च मर्यादामुळे तो पैसा सोन्यात गुंतवणूक करण्याकडे आता लोकांचा कल वाढला असल्याचे चित्र आहे.
-मनोज श्रॉफ, अध्यक्ष, जिल्हा सराफ असोसिएशन, नंदुरबार.