तळोद्यात समाजाभिमूख प्रकल्पांचा ‘अविष्कार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 13:00 IST2019-12-31T12:59:49+5:302019-12-31T13:00:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षकांमधील शोधक वृत्तीला चालना देण्यासाठी उमविमार्फत तळोदा येथे जिल्हास्तरीय अविष्कार स्पर्धा ...

तळोद्यात समाजाभिमूख प्रकल्पांचा ‘अविष्कार’
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षकांमधील शोधक वृत्तीला चालना देण्यासाठी उमविमार्फत तळोदा येथे जिल्हास्तरीय अविष्कार स्पर्धा घेण्यात आली. यात एकूण ३३३ स्पर्धक सहभागी झाले असून बहुतांश स्पर्धकांनी समाजाभिमूख प्रकल्प सादर केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे नंदुरबार जिल्हास्तरीय संशोधन अविष्काार स्पर्धा पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन विद्यापीठाच्या स्कुल आॅफ मॅनेजमेंटचे संचालक डॉ.अनिल डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे प्रभारी अध्यक्ष प्रा.सुधीरकुमार माळी, रमण पटेल, किर्तीकुमार शहा, एन.बी. राजकुळे, प्राचार्य डॉ.पी.वी.रामैया, नवापूरचे उपप्राचार्य ए.बी.महाजन, प्राचार्य डी.एम.माळी, डॉ.संजयकुमार शर्मा आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक जिल्हा समन्वयक डॉ.सुनिल गोसावी यांनी केले. स्पर्धेसाठी १७ विषय तज्ञ व एका निरीक्षकाची नेमणुक विद्यापीठाने केली. त्यांनी अत्यंत काटेकोर आणि नि:पक्षपणे परीक्षण करून विद्यापीठाला अहवाल केला. या स्पर्धेचा निकाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात येणार आहे. या जिल्हास्तरीय स्पर्धेतील विजेत्यांना दुसऱ्या टप्प्यात दि.७ जानेवारी रोजी विद्यापीठात होणाºया स्पर्धेत संधी दिली जाणार आहे. स्पर्धा यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.एस.आर.मगरे, डॉ.संजयकुमार शर्मा, स्थानीय समन्वयक डॉ.संदीप गरूड यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली प्रा.जे.एन.शिंदे, प्रा.ललित पाटील, प्रा.आर.डी. मोरे, डॉ. सुधीरकुमार श्रीवास्तव, डॉ.महेंद्र माळी, प्रा.मोहन वसावे, प्रा. पी.वी.तट्टे, प्रा.जे.के. पिंपरे, प्रा. पंकज सोनवणे, प्रा.के.एस .बेडसे, प्रा.आर.झेड. यशोद, वाय.एच. पंजराळे यांनी परिश्रम घेतले.
मानवविद्या, भाषा व ललित कला विभागातून ७३ विद्यार्थी, १४ शिक्षक
वैद्यकशास्त्र व औषधनिर्माणशास्र विभागातून ६५
शेती व पशुपालन विभागातून ३४ विद्यार्थी
विज्ञान विभागातुन १२६ विद्यार्थी
अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभागातून १२ विद्यार्थी, एक शिक्षक
वाणिज्य, व्यवस्थापन व विधीशाखेतून आठ विद्यार्थी
जिल्ह्यातून एकुण ३३३ स्पर्धकांनी घेतला सहभाग